
महाराष्ट्रात बीड जिल्ह्याची संतोष देशमुख हत्याप्रकरणामुळे सर्वत्र चर्चा सुरू आहेच, त्यात आता आणखी एका घटनेने सर्वांचे लक्ष वेधले आहे. बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांची धावती गाडीच जप्त करण्यात आली आहे. जिल्हाधिकारींची गाडी जप्त होण्याची बीडमधील ही पहिलीच घटन
.
नेमके प्रकरण काय?
बीड जिल्ह्यातील वडवणी तालुक्यातील चिखल बीड येथे 1998 साली लघु सिंचन प्रकल्प उभारण्यात आला होता. या प्रकल्पासाठी तीन शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित केल्या होत्या. त्या शेतकऱ्यांना तुटपुंजा मोबदला दिला होता. त्यामुळे शेतकऱ्यांनी याविरोधात न्यायालयात धाव घेतली होती. 1998 पासून संपादित केलेल्या जमिनीचा मावेजा अद्याप मिळालाच नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना 32 लाखांची भरपाई देण्याचे आदेश माजलगाव न्यायालयाने दिले. त्यानंतर शेतकऱ्यांना पैसे मिळाले नाही. तब्बल 9 वर्षांपासून शेतकऱ्यांना पैसे मिळाले नाहीत. यामुळे शेतकरी हताश झाले होते. शेतकऱ्यांनी अखेर न्यायालयात धाव घेतली आणि शेतकऱ्यांच्या बाजूने निकाल लागला.
न्यायालयाने आदेश देऊनही पैसे मिळाले नाही
न्यायालयाने शेतकऱ्यांना त्यांचा मोबदला देण्याचे अनेकवेळा आदेश दिले होते. तरी देखील कुठलीही कारवाई केली जात नव्हती. अखेर न्यायालयाने सर्व प्रकार समजून घेत जिल्हाधिकाऱ्यांची गाडी जप्त करण्याचे आदेश दिले. न्यायालयाने आदेश देताच जिल्हाधिकाऱ्यांची धावती गाडी म्हणजे वापरात असलेली गाडी जप्त करण्यात आली आहे. माजलगाव न्यायालयाने हा आदेश दिल्यानंतर सर्वत्र एकच खळबळ उडाली. कारण जिल्हाधिकाऱ्यांची गाडी जप्त होण्याची ही बीड जिल्ह्यातील पहिलीच घटना आहे.
जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांची गाडी जप्त करण्यात आली आहे. आता न्यायालय काही दिवस पैसे जमा होण्याची वाट बघेल. त्यानंतरही पैसे जमा नाही झाले तर जिल्हाधिकाऱ्यांच्या गाडीचा लिलाव करण्याचे आदेश न्यायालय देऊ शकते, असे वकिलांनी सांगितले आहे.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.