digital products downloads

भंडारज येथील शेतकऱ्याची आत्महत्या: तीन लाखांच्या कर्जाला कंटाळून संपवले जीवन, आठवड्यातील तिसरी घटना – Amravati News

भंडारज येथील शेतकऱ्याची आत्महत्या:  तीन लाखांच्या कर्जाला कंटाळून संपवले जीवन, आठवड्यातील तिसरी घटना – Amravati News


अंजनगाव सुर्जी तालुक्यातील भंडारज येथे एका शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना शुक्रवारी उशीरा रात्री उघडकीस आली. मृत शेतकऱ्याच्या पार्थिवावर आज, शनिवार, १७ मे रोजी शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. मृत शेतकऱ्याचे नाव संजय गजानन श

.

सातेगावात दोन आत्महत्यांची नोंद झाल्यानंतरची तालुक्यातील या आठवड्यातील ही तिसरी आत्महत्या आहे. त्यामुळे समाजमन सुन्न झाले असून हे ग्रहण केव्हा सुटणार, असा प्रश्न विचारला जात आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार भंडारज येथील अल्पभूधारक शेतकरी संजय शिंगणे यांनी राहत्या घरी गळफास घेउन जीवनयात्रा संपवली. सततची नापिकी आणि कर्जाचा डोंगर यामुळे गेल्या काही दिवसांपासून त्यांची मनस्थिती योग्य नव्हती, असे कुटुंबीयांचे म्हणणे आहे.

संजय यांच्या वडीलांचे नावे ४ एकर कोरडवाहू शेती आहे. या शेतीचा उदीम ते स्वत: करीत होते. परंतु अपेक्षित उत्पन्न मिळत नसल्याने गेल्या काही वर्षांपासून त्यांच्या पुढ्यात विवंचना निर्माण झाली होती. त्यांचे पश्चात आई, वडील व तीन भावंड, पत्नी आणि दोन मुले आहे. सततच्या नापिकीमुळे कर्जफेड नियमित न झाल्याने सात-बारावर कर्जाचा बोझा वाढत वाढत जाऊन तो तीन लाखावर जाऊन पोहचला होता. त्यामुळे संजय शिंगणे फारच व्यथित झाले होते. घटनेचा पुढील तपास अंजनगाव सुर्जी पोलिस करीत आहे.

सातेगावात ३५ वर्षीय शेतकऱ्याने झाडाला घेतला गळफास

अंजनगाव सुर्जी तालुक्यातील सातेगाव येथे एका ३५ वर्षीय शेतकऱ्याने आत्महत्या केली. अतुल नामदेव पातोंड या शेतकऱ्याने गावातील खोंळंग परिसरातील चौकात कडू लिंबाच्या झाडाला गळफास घेतला.

घटना रात्री ९ वाजताच्या सुमारास घडली. भररस्त्यावर घडलेली ही घटना कोणाच्याही लक्षात आली नाही. अतुलच्या कुटुंबाकडे २ एकर कोरडवाहू शेती आहे. सततची नापिकी आणि कर्जामुळे कुटुंब आर्थिक अडचणींमध्ये होते.

पोलीस पाटील वैशाली शेळके यांनी रहिमापूर पोलिसांना घटनेची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. मृतदेह उत्तरीय तपासणी आणि शवविच्छेदनासाठी अंजनगाव सुर्जीच्या ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला.

अतुलच्या पश्चात आई-वडील, भाऊ आणि दोन विवाहित बहिणी असा परिवार आहे. सातेगाव येथे एकाच आठवड्यात दुसऱ्यांदा अशी घटना घडल्याने गावकरी हादरले आहेत. रहिमापूर चिंचोली पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Uniq Art Store India

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Uttarakhand News Doonited
Social media & sharing icons powered by UltimatelySocial
Instagram
WhatsApp