
Maharashtra Weather News : भारतीय हवामाशास्त्र विभागानं नव्यानं सक्रिय झालेल्या पश्चिमी झंझातावाताच्या धर्तीवर देशात पुढील काही दिवसांसाठीचा हवामान अंदाज जारी केला आहे. ज्या धर्तीवर उत्तरेकडील राज्यांना हिमवृष्टीचा तडाखा बसणार असून, मध्य आणि दक्षिण भारतामध्ये वादळी पावसाचा इशारा जारी करण्यात आला आहे. ओडिशा आणि नजीकच्या भागांमध्ये आयएमडीनं उष्णतेच्या तीव्र लाटेचा इशारा देत नागरिकांना सतर्क केलं आहे.
महाराष्ट्रात पुन्हा अवकाळीचा इशारा
राज्याच्या विदर्भ भागामध्ये तापमानाचा आकडा मोठ्या फरकानं वाढत असतानाच आता पुन्हा एकदा राज्यातील काही जिल्ह्यांना अवकाळी पावसाचा इशारासुद्धा देण्यात आला आहे. त्यामुळं एकिकडे उन्हाचा तडाखा बसत असतानाच दुसरीकडे मात्र राज्यात अवकाळीचा मारा नागिरकांना सोसावा लागत आहे.
हवामान विभागाच्या माहितीनुसार शुक्रवारी दिवसाच्या सुरुवातीलाच राज्यात पावसाचा इशारा जारी करण्यात आला असून, पुढील दोन ते तीन दिवस ही स्थिती कायम राहण्याची शक्यता आहे. इथं प्रामुख्यानं कोकणात अवकाळीचा फटका बसण्याची शक्यता असून, राज्यातील इतर भागातही मध्यम ते तुरळक पावसाचा अंदाज व्यक्त कऱण्यात आला आहे. यामुळं मुंबई, पुणे, ठाण्यात ढगाळ वातावरण असण्याची शक्यता आहे. राज्यात विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये तापमानवाढ होत असल्यामुळं दक्षिणेकडील जिल्ह्यांमध्ये पावसासाठी पोषक वातावरण निर्मिती होताना दिसत आहे.
सध्याच्या घडीला कर्नाटकच्या अंतर्गत भागापासून मध्य महाराष्ट्र, उत्तर केरळपर्यंत कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. राज्यात सातत्यानं होणारी तापमानवाढ बाष्पीभवनाच्या प्रक्रियेला आणखी वाव देत असून, त्यामुळं उकाड्यात वाढ होत असतानाच राज्यात एकाएकी अवकाळीचे ढगही दाटून येत आहेत. ही स्थिती काही जिल्हे वगळता जवळपास संपूर्ण राज्यातच पाहायला मिळत आहे.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.