
अमरावतीत भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या जिल्हा शाखेचे एक दिवसीय अधिवेशन साईनगर येथील माँ जिजाऊ सभागृहात पार पडले. भाकपचे राज्य सचिव ॲड. सुभाष लांडे यांनी या वेळी मार्गदर्शन केले.
.
लांडे यांनी सांगितले की २०१४ पासून केंद्र सरकार भांडवलदारांच्या हिताचे निर्णय घेत आहे. सामान्य जनतेला समस्यांमध्ये ढकलले जात आहे. या परिस्थितीत लोकशाही आणि संविधानाच्या रक्षणासाठी भाकप सतत कार्यरत राहील.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाकपचे राष्ट्रीय कौन्सिल सदस्य तुकाराम भस्मे होते. व्यासपीठावर आयटकचे राज्य सरचिटणीस श्याम काळे, राज्य कार्यकारणी सदस्य अशोक सोनारकर, जिल्हा सचिव सुनील मेटकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
लांडे यांनी अमरावती जिल्ह्यातील पक्षाच्या इतिहासाचा आढावा घेतला. सुदाम काका देशमुख यांनी विधानसभेत आणि लोकसभेत प्रतिनिधित्व केल्याचे त्यांनी सांगितले. भाई एन डी मंगळे यांनी तिवसा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले. जिल्ह्यात अनेक ग्रामपंचायतींमध्ये भाकपची सत्ता असल्याचेही त्यांनी नमूद केले.
अध्यक्षीय भाषणात तुकाराम भस्मे यांनी सरकारवर टीका केली. देशात विविध प्रकल्पांच्या माध्यमातून धनसंपत्तीची लूट होत असल्याचे त्यांनी सांगितले. अदानी-अंबानींना जमिनी दिल्या जात असताना आदिवासी आणि गायरानधारकांना मात्र जमिनीवरून हुसकावले जात असल्याचा आरोप त्यांनी केला.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.