digital products downloads

भाषणात बाबासाहेबांचा उल्लेख न केल्याने महिलेचा संताप, गिरीश महाजनांची पहिली प्रतिक्रिया, ‘माझ्याकडून…’

भाषणात बाबासाहेबांचा उल्लेख न केल्याने महिलेचा संताप, गिरीश महाजनांची पहिली प्रतिक्रिया, ‘माझ्याकडून…’

Girish Mahajan On Madhavi Jadhav:  नाशिकमध्ये प्रजासत्ताक दिन सोहळ्यादरम्यान वनविभागाच्या महिला कर्मचाऱ्यने मंत्री गिरीश महाजन यांच्या भाषणावर आक्षेप घेतला. माधवी जाधव या वनविभागाच्या महिला कर्मचारी होते. प्रजासत्ताक दिनाच्या भाषणादरम्यान मंत्री गिरीश महाजन यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव घेतले नव्हते. यावर महिला कर्मचाऱ्याने आक्षेप घेतला. यानंतर संबंधित महिला कर्मचाऱ्याकडून जाब विचारण्याचा प्रयत्न झाला. पोलिसांनी तत्काळ महिला कर्मचाऱ्याला ताब्यात घेतलं. पण ‘सस्पेंड केलं तरी चालेल, मात्र मी कुणालाही घाबरणार नाही’, असं महिला कर्मचाऱ्याने म्हटलं. यावर आता गिरीश महाजनांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. 

Add Zee News as a Preferred Source

नाशिकमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत गिरीश महाजनांनी विविध विषयावर भाष्य केले. आम्ही जे पी गावित यांच्यासोबत चर्चा केली आम्ही त्यांना विनंती केली. उद्या कॅबिनेट आहे, तुम्ही मोर्चा नाशिकमध्येच थांबावा अशी मी विनंती केली.उद्या आदिवासी मोर्चाचे शिष्टमंडळ मुंबईत असणार आहे. आम्ही त्यांना चर्चेतून मार्ग काढून देणार आम्ही सर्व मंत्री एकत्रित मीटिंग घेऊ.मोर्चा वाल्यांना मुंबईत येण्याची आवश्यकता येऊ देणार नाही, मुख्यमंत्री उद्या मुंबईत असणार आम्ही सर्व अधिकारी एकत्र हा प्रश्न सोडवू असे महाजन म्हणाले.

‘कुंभ मेळा साधू महंत यांचाच’

जळगाव जिल्हा आणि नाशिक पोलिस हे पहिल्या क्रमांकावर आहेत. महसूल, जिल्हा, पोलीस यंत्रणा काम करतेय, सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर सर्व काम देखील सुरू होईल. सर्व काम तत्काळ पूर्णपणे वेळेत होईल असा आमचा प्रयत्न असल्याचे महाजन म्हणाले. साधू महंत यांची नाराजी होती ती आम्ही दूर केली असून सर्व काम कॉलिटी आणि दर्जेदार होईल.रस्ते कामात कॉलिटी दिसेल आम्ही लक्ष देत आहोत. कुंभ आयुक्त यांच्यावर नाराजी होती मात्र त्यावर आम्ही नाराजी दूर केली आहे. साधू महंत सांगतील त्यावर निर्णय घेऊ. कुंभ मेळा साधू महंत यांचाच आहे , त्यांनी काही ठिकाणी कामात पैसे वाढून मागितले तर कोणतीच नाराजी नसणार.आखाड्यांवर GST किंवा रॉयल्टी यावर गैरसमज नको, असेही महाजन म्हणाले.

‘राऊतांना पुरस्कार द्या’

ठाकरे ब्रँड वैगरे नाही, काही उरलेले नाही. मी सांगितल होत, दहा प्रमुख महानगरपालिका पैकी एक आणून दाखवा अस झालं नाही, असेही महाजन पुढे म्हणाले. भगतसिंह कोश्यारी यांना पद्मश्री जाहीर झाल्यानंतर संजय राऊतांनी टीका केली. यावर महाजनांनी राऊतांना टोला लगावला. राऊतांना एखादा मोठा पुरस्कार देण्याची वेळ आलीय.मी स्वतः केंद्र सरकारकडे शिफारशी करतो. खोट बोल पण रेटून बोल पुरस्कार द्यावा, असा टोला महाजनांनी राऊतांना लगावला.
 

महिलेच्या आक्षेपावर काय म्हणाले महाजन?

26 जानेवारी 2026 च्या भाषणात गिरीश महाजनांकडून बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाचा उल्लेख राहिला. यावर महिला अधिकाऱ्याने आक्षेप नोंदवल्यानंतर तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. यावर आता गिरीश महाजनांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. मी दिलगिरी व्यक्त करतो.माझ्याकडून अनावधानाने झालं असेल, असे महाजन यावेळी म्हणाले. 

पोलिसांकडून त्वरित कारवाई

गोंधळ वाढताच पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप केला. त्यांनी माधवी जाधवला ताब्यात घेतले आणि कार्यक्रमातून बाहेर काढले. पोलिसांनी माधवी यांच्यावर कोणतीही कठोर कारवाई तात्काळ केली नाही, पण त्यांना नियंत्रणात घेणे गरजेचे होते. या घटनेनंतर त्यांची विभागाकडूनही चौकशी सुरू होण्याची शक्यता आहे. 

काय म्हणाल्या माधवी?

ताब्यात घेताना माधवी जाधव यांनी निर्भीडपणे सांगितले, “मला निलंबित केले तरी हरकत नाही, मी कोणालाही भीत नाही.” या घटनेनंतर सोशल मीडियावर आणि बातम्यांमध्ये चर्चा सुरू झाली. काहींनी त्यांच्या कृतीला समर्थन दिले तर काहींनी ते अयोग्य असल्याचे म्हटले.

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Uttarakhand News Doonited
Social media & sharing icons powered by UltimatelySocial
Instagram
WhatsApp