
शेकडो किलोमीटरचा प्रवास करत, चिखल, ऊन, थकवा आणि अडथळ्यांवर मात करत, विठुरायाच्या भेटीसाठी हजारो वारकरी दरवर्षी पंढरपूरकडे निघतात. त्यात आता देशविदेशातील भाविकही मोठ्या संख्येने सामील होत आहेत. तामिळनाडू येथील काही वारकरी नोकरी व्यवसायाच्या निमित्ताने
.
कडेनल्लूर (तामिळनाडू) येथील संस्थान तर्फे वारकरी संप्रदायाचा प्रचार, प्रसार सुरु आहे. या संस्थानचे वारकरी मागील ५० वर्षांपासून अधिक काळापासून संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यात आळंदी ते पंढरपूर पायीवारी करतात. बाबा महाराज सातारकर दिंडी क्रमांक ३० मध्ये तामिळनाडू मधील हे वारकरी सहभागी आहेत. येळीव (ता. माळशिरस) पालखी विसावाच्या ठिकाणी तमिळ भाषिक वारकऱ्यांची दिंडी भजन म्हणत पंढरपूरकडे निघाली होती.
आमच्या सेवेत भाषेचा अडथळा येत नाही – रघुराज महाराज
दिंडीतील भाविकांशी संवाद साधला असता, दिंडी प्रमुख रघुराज महाराज म्हणाले,“मी संत साहित्याचा अभ्यास केला असून, मागील १८ वर्षांपासून दिंडी सोहळ्यात सहभागी होतोय. वारकरी संप्रदायाचा प्रचार, प्रसार आम्ही तामिळनाडू मध्ये करतोय. हरिपाठ, भजन, ज्ञानेश्वरी, एकनाथ भागवत, संत तुकाराम महाराजांची गाथा तमिळ भाषेत अनुवादित केलेली आहे. आमच्या दिंडीतील वारकऱ्यांना हरिपाठ, भजन सर्व मराठीमध्ये अस्खलित म्हणता येते. पण, आम्हाला मराठी भाषेत बोलता येत नाही. आमच्या सेवेमध्ये भाषेचा कोणताही अडथळा येत नाही, असेही त्यांनी सांगितले.
शेवटच्या श्वासापर्यंत वारी सहभागाचे भाग्य लाभावे – श्वेता सुंदरम
वारी सोहळ्यात भौतिक सुविधांपेक्षाही आम्हाला मानसिक सुख, समाधान खूप मिळते, त्याचे वर्णन आम्ही शब्दांमध्ये देखील त्याचे वर्णन होऊ शकत नाही, त्यामुळे शेवटच्या श्वासापर्यंत नियमीत वारी सोहळ्यात सहभागाचे भाग्य लाभावे, अशी भावना लंडन येथून आलेल्या श्वेता सुंदरम यांनी व्यक्त केली.
वारी सोहळ्यातील आनंद अवर्णनीय – श्रीधर सुब्रमण्यम
मेलबर्न येथील श्रीधर सुब्रमण्यम म्हणाले,“वारी सोहळ्यात सहभागासाठी चेन्नई येथे आलो. तेथून वारकऱ्यांच्या समवेत रेल्वेने पुण्यात आलो, तेथून दिंडी सोहळ्यात सहभागी झालो. वारी सोहळ्याचे माझे पहिलेच वर्ष आहे. चेन्नई येथील वारकरी संप्रदायाचा ऑस्ट्रेलियामध्ये एक कार्यक्रम झालेला. त्यानंतर ऑनलाईन ज्ञानेश्वरी ग्रंथ वर्गामध्ये मी सहभागी झालेलो. माऊलींनी विश्वकल्याणासाठी लिहलेले पसायदान, हरिपाठ याचा तेलगू भाषेत महाराजांनी अर्थ सांगितल्यानंतर वारी सोहळ्यात सहभागाची उत्सुकता वाढली.
कधी एकदा आळंदीला जाऊ, माऊलीच्या समाधीवर डोक ठेवू, एवढी उत्कंठा निर्माण झालेली. वारी सोहळ्याच्या निमित्ताने मेलबर्न मधून निघालो. दहा दिवसांच्या या सोहळ्यात चित्तशुद्धीची अनुभूती येत आहे. रोजच्या वाटचालीमध्ये हरिनामाचा जयघोष करतो. मुक्कामाच्या ठिकाणी तमिळ भाषेत प्रवचन होतात. भौतिक सुविधांपेक्षाही आम्हाला मिळणारा आनंद सोहळ्यातील आनंद अवर्णनीय आहे, असे त्यांनी सांगितले.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.