digital products downloads

भास्कर जाधव यांचा अजित पवारांवर हल्लाबोल: निधी वाटपावरून विधानसभेत टीका, म्हणाले- कोणाला किती पैसे द्यायचे, हे अर्थमंत्री कसे ठरवू शकतात? – Mumbai News

भास्कर जाधव यांचा अजित पवारांवर हल्लाबोल:  निधी वाटपावरून विधानसभेत टीका, म्हणाले- कोणाला किती पैसे द्यायचे, हे अर्थमंत्री कसे ठरवू शकतात? – Mumbai News


राज्य विधिमंडळ पावसाळी अधिवेशनात शिवसेना ठाकरे गटाचे नेते व आमदार भास्कर जाधव यांनी निधीचा मुद्दा उपस्थित करत अर्थमंत्री अजित पवार यांच्यावर हल्लाबोल केला आहे. कोणाला किती पैसे द्यायचे हे अर्थमंत्री कसा ठरवू शकतो? असा सवाल भास्कर जाधव यांनी उपस्थित क

.

सभागृहात बोलताना भास्कर जाधव म्हणाले, राज्याचा नियमित अर्थसंकल्प मार्च महिन्यात मांडला गेला, आणि पुन्हा 57 हजार कोटींच्या पुरवण्या मागण्या मागितल्या गेल्या आहेत. अर्थमंत्र्यांनी 7 लाख 75 हजार कोटींचा अर्थसंकल्प मांडला, मात्र अजूनही 2 अधिवेशन यंदाच्या वर्षात बाकी आहेत. अशात दोनदा पुरवणी मागण्या घेऊन येतील, तुटीचा अर्थसंकल्प मांडायला लागले आहेत. एकीकडे आम्हाला निधी मिळत नाही, अजित दादा अर्थमंत्री आहेत, मला त्यांचा आदर आहे. पण, संगमेश्वरला ते आले असताना गुहागर येथे छत्रपतींचा पुतळा उभारण्यासाठी 10 कोटी रुपयांचा निधी मागितला होता. मात्र, त्यांनी साधा होकार देखील दिला नाही. मला जेवणाचे निमंत्रण होते. पण, असंख्य इंगळ्या डसल्या, कोण जेवणार तुमचे जेवण, असे म्हणत भास्कर जाधवांनी अजित पवारांवर टीका केली आहे.

पुढे बोलताना भास्कर जाधव म्हणाले, भाजपवाले अर्थ खात्याबद्दल तक्रारी करत आहेत, शिवसेनावाले तर आधीपासूनच तक्रारी करत होते, असा अर्थसंकल्प असत नसतो. राज्याच्या तिजोरीवर कर्ज होतंय, ज्याने कर्ज काढलेले नाही त्याच्या डोक्यावर कर्ज आहे. बोलून बोलून काय कराल, निधी देणार नाही, अरे तो तसाही तुम्ही देत नाहीत, अशा शब्दात भास्कर जाधव यांनी अजित पवारांवर जोरदार हल्लाबोल केला.

कोणी एकाने चालवणारं हे खातं नाही. 7 लाख 75 हजार कोटींचा अर्थसंकल्प हा 8 लाख 15 हजारांवर घेत, 1 लाख रुपयांच्या तुटीचा अर्थसंकल्प सादर केला गेला आहे. सध्या, जीएसटीवर तुमचं सर्व सुरु आहे, जीएसटी नसता तर काय होईल, असा सवालही भास्कर जाधव यांनी उपस्थित केला.

भास्कर जाधव म्हणाले, एखादी आपत्ती आली, पाऊस पडला, तर पैसे कुठून आले? राखीव निधीसाठी सभागृहासमोर यावे लागले. गृह विभागावर बोलत असताना मी कृषी विभागावरही बोलतो. बाब क्रमांक 3, आशिषजी तुमच्याकडे कृषी आहे ना? आपले कृषी मंत्री आहेत कुठे? वरच्या सभागृहात काय? चाक बिक पडतेय काय? म्हणून येत नाहीत? असा खोचक सवाल जाधव यांनी उपस्थित केला.

भास्कर जाधवांचा नितेश राणे यांना टोला

नितेश राणे यांच्यावर टीका करताना भास्कर जाधव म्हणाले, लोकांना शिव्या देता, त्यातून मुख्यमंत्र्यांची शाबासकी मिळवता. त्याऐवजी ड्रेझरसाठी हट्ट करा आणि कोकणाला मदत करा. बाहेर जाऊन तुम्ही मला शिव्या द्याल, काही हरकत नाही. माझ्यासमोरच ही लहानाची मोठी झाली आहेत, आता काय ती मोठ्ठीच झालीत, असा टोला त्यांनी लगावला आहे.

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Uniq Art Store India

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Uttarakhand News Doonited
Social media & sharing icons powered by UltimatelySocial
Instagram
WhatsApp