
समाजात भिती घालणारे लोक भरपूर भेटतील; पण धाडस शिकवणारे लोक कमी भेटतील. भीती हा सर्वात मोठा आजार आहे, धाडस हा उपाय आहे. डोक्यात आलेला आजार हा शरीरात उतरतो. त्यामुळे डोक्यात आजारांची गाठ बांधू नका. यासोबत नागरिकांना दैनंदिन जीवनात भेडसावणाऱ्या समस्या,
.
दि बेरार जनरल एज्युकेशन सोसायटी अकोला, राजीविन सोलर यांच्या संयुक्त विद्यमाने श्री राधाकिसन लक्ष्मीनारायण तोष्णीवाल विज्ञान महाविद्यालय येथे जाहीर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी दि बेरार जनरल एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष अॅड. मोतीसिंग मोहता, डॉ. पवन माहेश्वरी, आरएलटी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजेश चंद्रवंशी, बालमुकुंद भिरड, सिमरन नागरा, ज्ञानेश साबळे, ज्येष्ठ कवी बापूराव झटाले आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजक मनसे जिल्हाध्यक्ष व संचालक पंकज साबळे यांनी प्रास्ताविकेतून कार्यक्रमाची भूमिका विशद केली.
योग्य आहार व व्यायाम आवश्यक : नागरिकांनी सुदृढ आरोग्य सांभाळण्यासाठी योग्य आहार व व्यायाम करावा असे मत अध्यक्षीय भाषणात अॅड. मोहता यांनी व्यक्त केले. सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन शिवाजी भोसले यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी शाम देशमुख, सौरभ भगत, प्रायांक बालोदे, पंकज देशमुख, प्रदीप मुस्तद, गौरव देशमुख आदींनी पुढाकार घेतला.
आयुष्य आनंदात जगायचे. रडणाऱ्यांना कोणी विचारत नाही. हसत खेळत जगणाऱ्यांना लोक विचारतात. जगताना अधू म्हणून जगू नका. हिंमतीने जगा, हिंमत असेल तरच किंमत आहे. आनंदाने जगण्यासाठी कोणताही पैसा लागत नाही, मात्र रुग्णालयात पैसा लागतो. औषधाविना जगायचे असेल तर औषधे बाजूला सारून निसर्गोपचार करणे आवश्यक आहे. यासाठी शरीराचे शुद्धीकरण करून घेणे आवश्यक आहे. शरीरातील घाण बाहेर पडल्यास शरीर रोगमुक्त राहते. नागरिकांच्या सुदृढ आरोग्य व निसर्गदायी जीवनासाठी निसर्गोपचाराचा अवलंब करावा असेही म्हणाले.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.