
देवेंद्र फडणवीस यांचे सरकार हे चारित्र्यहीन सरकार आहे. महाराष्ट्राच्या बाबतीत हा शब्द वापरण्यासाठी आमची जीभ धजावत नाही. यासाठी मुख्यमंत्री फडणवीस हेच जबाबदार आहेत. त्यांचा काही दिवसांपूर्वी वाढदिवस झाला, अनेकांनी त्यांचे कौतुक केले, हे धान्यात घेत त्
.
संजय राऊत म्हणाले की, फडणवीस यांच्या सरकारमधील मंत्री डान्सबार चालवतो. आमच्या आर.आर. पाटील यांनी हे डान्सबार बंद केले होते. ती संस्कृती तुमच्या गृह राज्यमंत्र्यांनी पुन्हा आणली आहे. ते स्वत: डान्स बार चालवत आहे. एक मंत्री पैसे दाखवतोय, दुसरा रमी खेळतोय, तिसरा गरीबांना मारहाण करतोय हे तुमच्या सरकारचे चारित्र्य आहे.
मुंडेंना मंत्रिमंडळात घेण्याची घाई का?
संजय राऊत म्हणाले की, या सरकारमध्ये फौजदार, न्यायालय आणि चौकशी समिती सर्व काही त्यांचेच आहे. त्यामुळे कुणाला क्लीन चीट द्यायची हे आधीच ठरलेले असते. धनंजय मुंडे यांना क्लीन चीट देण्याचे काम कोण करत आहे मला माहिती नाही. हे सरकार कुणाचे आहे? ज्या प्रकरणामुळे त्यांना जावे लागले तो विषय अतिशय गंभीर आहे. इतक्या घाई-घाईने एखाद्याला पुन्हा मंत्रिमंडळात घेण्याची घाई अजित पवारांना का झाली आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा अजून निकाल लागलेला नाही.
अन् फडणवीस नैतिकतेच्या गप्पा मारतात
संजय राऊत म्हणाले की, अजित पवार माणिकराव कोकाटे यांना पदावरून काढायला तयार नाहीत. एकाला काढून दुसऱ्याला घेण्याचा काम सुरू आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लक्षात घेतले पाहिजे की संपूर्ण मंत्रिमंडळ बदलण्याची गरज आहे. हे सगळे भ्रष्ट मंत्री आहेत, लेडीज बार, डान्स बार चालवत आहे, असे मंत्री कॅबिनेट मध्ये असताना आपण मुंबईपासून दिल्लीपर्यंत नैतिकतेच्या गप्पा मारतो आहोत.
काळ्या पैशातून शिंदेंचे सामाजिक कार्य
संजय राऊत म्हणाले की, देवेंद्र फडणवीस यांनी कानाचे पडदे साफ केले पाहिजे. विरोधी पक्ष जे बोलत आहे ते गांभीर्याने घ्या. नाही तर झारखंडचे पोलिस येतील आणि एखाद्या मंत्र्याला किंवा खासदाराला अटक करतील इतके हे गंभीर प्रकरण आहे. अमित साळुंकेंचा विषय वाटतो तितका सोपा नाही, असे म्हणत श्रीकांत शिंदे आणि एकनाथ शिंदेंचे नाव न घेता राऊतांनी अप्रत्यक्ष इशारा दिला आहे. शिंदे यांचे मेडिकल फाउंडेशनचा पैसा हा भ्रष्ट मार्गाने आला आहे. अमित साळुंकेंना गैरमार्गाने कंत्राट देत हा पैसा जमा करण्यात आला आहे. मद्य घोटाळा, 108 रुग्णवाहिका घोटाळा समोर आला आहे. यासाठी शिंदे पिता-पुत्राने अमित साळुंकेंना गैरमार्गाने काम दिल्याचा आरोप राऊतांनी केला आहे. या पैशातून श्रीकांत शिंदेंचे सामाजिक कार्य सुरू आहे. या गोष्टीचे गांभीर्य जर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना कळत नसेल तर त्यांनी आपण मुख्यमंत्री आहोत हे विसरुन जावे. सहन करणार नाही म्हणणाऱ्या सीएम फडणवीसांनी यांना पहावे.
अमित साळुंकेंच्या कंपनीची चौकशी करा
संजय राऊत म्हणाले की, अमित साळुंकेंच्या कंपनीच्या माध्यमातून शिंदे पिता-पुत्राने हजारो कोटींचे घोटाळे केले आहेत. त्यामुळे त्यांची आता धावाधाव सुरू आहे. फडणवीस यांनी एक एसआयटी स्थापन करत कल्याण मनपा घनकचरा व्यवस्थापनासाठी दिलेल्या कंत्राटाची चौकशी केली पाहिजे. त्यात अमित साळुंकेंच्या कंपनीची संपूर्ण चौकशी केली पाहिजे.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.