
Thackeray Bihar Connection: महाराष्ट्रात भाषेचा वाद इतका वाढला आहे की आता राज ठाकरे यांच्या मनसेचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले आहेत. मराठी भाषेसाठी मीरा रोड येथे अभूतपूर्व असा मोर्चा निघाला. मराठी एकीकरण समितीने आयोजित केलेल्या या मोर्चात मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते उपस्थित होते. काही दिवसांपुर्वीच ठाकरे बंधुंनी विजयी मेळावा साजरा केला होता. आम्ही कोणत्याही भाषेला विरोध करत नाही आहोत, मराठींवर हिंदी लादू नये, ही आमची भूमिका असल्याचे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी असेही म्हटले आहे.
महाराष्ट्रात हिंदी तर मग उत्तर भारतीय राज्यांमध्ये तिसरी भाषा कोणती असेल? असा प्रश्नही त्यांनी विचारला. मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेने मराठीच्या मुद्द्यावर भाजपला कोंडीत पकडण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान ठाकरे परिवााचे बिहार कनेक्शन काय आहे? याबद्दल जाणून घेऊया. माझी जीवनगाथा या आत्मचरित्रात माहिती
मराठीच्या मुद्द्यावर ठाकरेंची शिवसेना आणि मनसेची भूमिका नेहमीच आक्रमक राहिली आहे. ते त्यांच्या मुद्द्यांवर आक्रमक राजकारण करत आले आहेत. काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांनी ठाकरे कुटुंब बिहारींना घुसखोर म्हणत असल्याचे सांगितले तेव्हा मराठी भाषा आणि मराठी माणसाचे राजकारण करणाऱ्या ठाकरे बंधूंच्या राजकारणावर प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. पण राज आणि उद्धव यांचे आजोबा केशव ठाकरे यांनी माझी जीवनगाथा या आत्मचरित्रात याबद्दल माहिती दिली आहे. त्यांचा समुदाय मगधमधून महाराष्ट्रात आला. त्यावेळी खूप वाद झाला होता आणि उद्धव ठाकरे यांनी दिग्विजय सिंह यांच्यावर संताप व्यक्त करत म्हटले होते की, ‘आजोबांनी त्यांच्या पुस्तकात लिहिले आहे की त्यांच्या समुदायाचे लोक बिहारमध्येही राहतात’.
ठाकरे कुटुंबाचा इतिहास काय आहे? बिहारशी काय संबंध?
बाळासाहेब ठाकरे असोत किंवा राज ठाकरे असोत, सर्वांनी मराठी अस्मितेसाठी लढा उभारला. पण ठाकरे कुटुंब बिहारचे आहे असे म्हटल्यावर त्यांच्यावर प्रश्न उपस्थित केले जाऊ शकतात. या युक्तिवादाचा आधार बाळ ठाकरे यांचे वडील आणि उद्धव ठाकरे यांचे आजोबा केशव ठाकरे उर्फ प्रबोधनकार ठाकरे यांच्या आत्मचरित्रात आहे. ज्यामध्ये त्यांनी लिहिले आहे की महापद्मनंदांच्या कारकिर्दीत त्यांच्या जातीचे लोक मगधमध्ये राहत होते. पण नंद राजवंशानंतर राजांच्या अत्याचारांना कंटाळून ते मध्य प्रदेशमार्गे महाराष्ट्रात आले आणि स्थायिक झाले. केशव ठाकरे हे चंद्रसेनीय कायस्थ प्रभु जातीचे आहेत. जी महाराष्ट्रात ब्राह्मणांच्या समतुल्य मानली जाते. किंवा ती त्यांच्या नंतरची सर्वात प्रगत जात मानली गेली. या समुदायाला बिहारच्या कायस्थांची उप-जात म्हणून पाहिले जाते. कारण ते कायस्थ जातीच्या लोकांप्रमाणेच प्रशासकीय कामात भाग घेतात. असे असले तरी ठाकरे कुटुंबाचा बिहारशी थेट संबंध नाही. त्यांचे पूर्वज तिसऱ्या किंवा चौथ्या शतकात महाराष्ट्रात येऊन स्थायिक झाले आणि या ठिकाणाच्या संस्कृतीत ते रुजले आहेत.
चंद्रसेनीय कायस्थ प्रभु समाजाचा मगध ते महाराष्ट्र असा प्रवास
चंद्रसेनीय कायस्थ प्रभु समाजाच्या लोकांनी मगध ते महाराष्ट्र या प्रवासात खूप मोठा पल्ला गाठला. मराठी इतिहासकार व्ही.के. राजवाडे आणि जी.एस. सरदेसाई हे देखील मानतात की, चंद्रसेनीय कायस्थ प्रभू (सीकेपी) हे क्षत्रिय-प्रशासकीय वर्गाचे लोक आहेत ज्यांचे मूळ उत्तर भारत मगध किंवा उज्जैनचे असल्याचे ते मानतात. केशव ठाकरे यांनी त्यांच्या आत्मचरित्रात लिहिले आहे की, त्यांच्या कुटुंबाचे पूर्वज मराठा राजवटीत धोडप किल्ल्याचे किल्लादार म्हणून काम करत होते. त्यांचे पणजोबा कृष्णाजी माधव धोडपकर पाली, रायगड येथे राहत होते, तर त्यांचे आजोबा रामचंद्र ‘भिकोबा’ धोडपकर पनवेल येथे स्थायिक झाले होते.
ठाकरे स्पेलिंग
केशव ठाकरे यांचे वडील सीताराम यांचा जन्म सीताराम रामचंद्र धोडपकर म्हणून झाला होता. पण परंपरेनुसार मोठे झाल्यानंतर त्यांनी ‘पनवेलकर’ हे आडनाव धारण केले. पण आपल्या मुलाला शाळेत दाखल करताना त्यांनी त्याला ‘ठाकरे’ हे आडनाव दिले. जे ‘धोडपकर’ च्या आधी त्यांचे मूळ कौटुंबिक नाव होते. Thakre हे त्यांच्या कुटुंबाच्या नावाचे स्पेलिंग होते पण ब्रिटिश लेखक विल्यम मेकपीस ठाकरे यांच्या प्रभावाखाली त्यांनी त्यांच्या आडनावाचे स्पेलिंग Thackeray असे बदलले. ठाकरे परिवार हेच आडनाव आणि स्पेलिंग वापरताना आपण पाहिले असेल.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.