digital products downloads

मराठी-हिंदी वादावर भाजपाने आखली रणनिती, राज-उद्धव यांच्या विरोधाला मोदींच्या नावे देणार उत्तर; वर्षावरील बैठकीत निर्णय

मराठी-हिंदी वादावर भाजपाने आखली रणनिती, राज-उद्धव यांच्या विरोधाला मोदींच्या नावे देणार उत्तर; वर्षावरील बैठकीत निर्णय

BJP Strategy over Hindi Language Row: राज्यातील शाळांमध्ये हिंदी शिकवण्यावरुन विरोध सुरु असताना भाजपाने रणनिती आखली आहे. मराठी-हिंदी वादाचे राजकारण हाणून पाडण्याचा निर्णय भाजपाने घेतला आहे. महाराष्ट्र भाजपाच्या कोअर कमिटीच्या बैठकीत भाषीय वादावर चर्चा करण्यात आली. यादरम्यान आरोप प्रत्यारोपापेक्षा मराठी भाषेला अभिजात दर्जा दिल्याचा प्रचार करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्याचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळेच झाल्याचं भाजपा लोकांपर्यत पोहोचवणार आहे. 

मराठी-हिंदी भाषा वाद उकरून काढण्याचे प्रयत्न स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केले जात असल्याची भूमिका घेत, यामागचे राजकारण हाणून पाडण्याचा निर्णय भाजप कोअर कमिटीच्या बैठकीत घेण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानी झालेल्या कोअर कमिटीच्या बैठकीत हिंदी भाषेवरून उद्धव ठाकरे, राज ठाकरे यांनी घेतलेली भूमिका आणि भाजपची भूमिका यावर चर्चा झाल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे. बैठकीला प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण, राष्ट्रीय सहसंघटन मंत्री शिवप्रकाश, माजी प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, सुधीर मुनगंटीवार, मंत्री चंद्रकांत पाटील, खा. अशोक चव्हाण, मुंबई अध्यक्ष आशिष शेलार उपस्थित होते.

मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्याचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळेच होऊ शकला, हे लोकांपर्यत आवर्जून पोहोचवा, असा दर्जा मिळाल्याने त्याचा मराठी भाषेच्या संवर्धनासाठी कसा फायदा होणार आहे, तेही जनतेत जाऊन सांगण्याचा निर्णय भाजपाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. 

या बैठकीत मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्यानंतर राज्य सरकारने त्याला पूरक जे निर्णय घेणे आवश्यक आहेत ते लवकरात लवकर घेण्याबाबतही चर्चा झाली. हिंदीची कोणतीही सक्ती राज्य सरकारने केलेली नसली तरी त्याबाबत चुकीचे चित्र निर्माण केले जात आहे, अशी भावना बैठकीत व्यक्त करण्यात आली. निवडणुका आल्या की मराठी-अमराठी वाद उकरून काढायचा, त्यातून भावनिक वातावरण तयार करायचे आणि राजकीय फायदा उचलायचा हे वर्षानुवर्षे करण्यात येत आहे. यावेळी असे मनसुबे उधळून लावण्याच्या दृष्टीने रणनीती निश्चित करण्याचेही आजच्या बैठकीत ठरलं आहे. 

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुती म्हणूनच सामोरं जाण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आज आपल्या पक्षांमध्ये मतैक्य नसेल तर त्याचा फायदा विरोधक घेऊ शकतात. त्यामुळे स्वबळावर लढण्याची भाषा कोणीही सध्या करू नये, असे ठरविण्यात आल्याची माहितीही सूत्रांनी दिली आहे. 

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Uniq Art Store India

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Uttarakhand News Doonited
Social media & sharing icons powered by UltimatelySocial
Instagram
WhatsApp