
राज्यातील महसूल सेवकांचा दीर्घकाळ प्रलंबित असलेला प्रश्न मार्गी लावण्यासाठी शासनाने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी महसूल सेवकांना तलाठी भरतीत प्राधान्य देण्याचे महत्त्वपूर्ण आश्वासन दिले आहे. यासंबंधीच्या प्रस्तावाव
.
उच्चस्तरीय बैठकीत महत्त्वाचे निर्णय
मंत्रालयात महसूलमंत्री बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच एक उच्चस्तरीय बैठक पार पडली. या बैठकीस मुख्य सचिव राजेश मिना, अतिरिक्त मुख्य सचिव व्ही. राधा, वित्त विभागाचे अप्पर मुख्य सचिव ओमप्रकाश गुप्ता, महसूल विभागाचे अप्पर मुख्य सचिव विकास खारगे तसेच महसूल सेवक संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
महसूल सेवकांना चतुर्थ श्रेणी मध्ये समाविष्ट करून मानधनाऐवजी वेतनश्रेणी लागू करण्याची मागणी बैठकीत विचारात घेण्यात आली. मात्र, सध्याच्या नियमांनुसार वेतनश्रेणी लागू करणे शक्य नसल्याचे स्पष्ट करण्यात आले.
तलाठी भरतीत अनुभव महत्त्वाचा
यावर तोडगा काढत महसूलमंत्र्यांनी महसूल सेवकांना न्याय देण्यासाठी एक महत्त्वपूर्ण पर्याय सूचवला. महसूल सेवकांच्या अनुभवाचा विचार करून तलाठी भरतीमध्ये त्यांच्यासाठी काही जागा राखीव ठेवण्याचा आणि ज्यांना किमान पाच वर्षांचा अनुभव आहे, त्यांना २५ अतिरिक्त गुण देण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला. या प्रस्तावावर अधिकाऱ्यांनी तातडीने सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.
बावनकुळे यांनी आश्वासन दिले की, पूरस्थितीसारख्या कठीण काळात प्रशासनाला मदत करणाऱ्या महसूल सेवकांचे प्रश्न सरकार प्राधान्याने सोडवेल. त्यांच्या मानधनात पूर्वीच वाढ करण्यात आली असून, आता त्यांच्या अनुभवाचा उपयोग राज्य प्रशासन अधिक परिणामकारक करण्यासाठी केला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.