
कोल्हापूर जिल्ह्यातील नांदणी मठातील महादेवी हत्तीणीला वनतारा येथे पाठवण्यात आले. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर हा निर्णय घेण्यात आला, पण या निर्णयाला कडाडून विरोध करण्यात आला. गावकऱ्यांनी ‘महादेवी’ उर्फ माधुरीला परत द्या अशी मागणी देखील केली. या प्रकरणावर आतापर्यंत सर्वात मोठी अपडेट समोर आली आहे.
वनतारा अधिकाऱ्यांकडून…
वनताराच्या अधिका-यांकडून नांदणी मठाची पाहणी करण्यात आली आहे. महादेवी हत्तीणीला परत आणायच्या हालचाली सुरु झाल्याच सांगण्यात येत आहे. अधिका-यांकडून नांदणीतील जागेची पाहणी केली आहे. महादेवी हत्तीण परत येणं जवळपास निश्चित असल्याच म्हटलं जात आहे.
काय आहे प्रकरण?
माधुरी नावाच्या हत्तीणीला कोल्हापूरहून वनतारा येथे पाठवण्याच्या मुंबई उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा तीव्र विरोध करण्यात आला. अशा परिस्थितीत वनताराने दिलेल्या माहितीनुसार, न्यायालयाच्या आदेशावरून माधुरीला येथे आणण्यात आले. लोकांच्या भावना आणि माधुरीबद्दलची त्यांची ओढ लक्षात घेऊन, कोल्हापुरात पुनर्वसन केंद्र बांधण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, असं सांगण्यात येत आहे.
महादेवी हत्तीण मठात कशी आली?
१९९२ साली स्वस्तिश्री जिनसेन भट्टारक जैन मठात आलेली महादेवी हत्तीण गेली ३६ वर्षं गावाच्या संस्कृतीचा भाग बनली होती. तिला “मठाची लेक”, “ग्रामदेवतेची सावली” अशा उपमा गावकरी प्रेमाने देत. पण पीपल फॉर एथिकल ट्रीटमेंट ऑफ अॅनिमल्स (PETA) च्या तक्रारीनंतर न्यायालयाने तिचा आरोग्याचा विचार करून निर्णय दिला. आणि महादेवी हत्तीणीला गुजरातमधील जामनगर येथील वनतारा हत्तींच्या कल्याण केंद्रात हलवावे.
सर्वोच्च न्यायालयानेही उच्च न्यायालयाचा निर्णय कायम ठेवल्यावर हा दिवस टाळता आला नाही. 29 जुलै 2025 रोजी गावाने महादेवीला जड अंत:करणाने निरोपा दिला. तब्बल १०,००० हून अधिक लोक मठासमोर गोळा झाले. कुणाच्या हातात फुलं, कुणाच्या ओठांवर मंत्र… पण हृदयात मात्र वेदना. “ती काही हत्तीण नव्हती, आमची लेक होती,” असं प्रत्येकाच्या डोळ्यांतून सांगितलं जात होतं.
महादेवीसाठी आंदोलन
महादेवी हत्तीणीच्या निरोप समारंभाच्या वेळीच वातावरण चिघळलं. यानंतर वाहने फोडली गेली, पशुवाहक अॅम्ब्युलन्सवर दगडफेक झाली. पोलीस दलावरही संतप्त जमावानं हल्ला केला. यामध्ये 10 पोलीस जखमी, 80 जणांना अटक, आणि लाठीमार करण्यात आला.
FAQ
महादेवी हत्तीण प्रकरण नेमकं काय आहे?
महादेवी, ज्याला स्थानिक लोक “माधुरी” म्हणूनही ओळखतात, ही कोल्हापूर जिल्ह्यातील नांदणी मठातील हत्तीण आहे. १९९२ पासून ती मठात राहत होती आणि गावाच्या धार्मिक व सांस्कृतिक जीवनाचा अविभाज्य भाग बनली होती. पीपल फॉर एथिकल ट्रीटमेंट ऑफ अॅनिमल्स (PETA) च्या तक्रारीनंतर, हत्तीणीचा मिरवणुकीसाठी परवानगीशिवाय वापर आणि तिच्या आरोग्याच्या काळजीबाबत प्रश्न उपस्थित झाले. यामुळे मुंबई उच्च न्यायालयाने आणि नंतर सर्वोच्च न्यायालयाने तिला गुजरातमधील वनतारा प्राणी संवर्धन केंद्रात हलवण्याचा आदेश दिला. २९ जुलै २०२५ रोजी तिला वनताराला पाठवण्यात आलं, ज्याला स्थानिकांनी तीव्र विरोध केला.
महादेवीला वनताराला का पाठवण्यात आलं?
PETA च्या तक्रारीनंतर, चौकशी समितीने महादेवीच्या देखभालीबाबत तिचे संगोपन प्राण्यांच्या हक्कांनुसार योग्य नसल्याचा अहवाल सादर केला. मुंबई उच्च न्यायालयाने आणि सर्वोच्च न्यायालयाने तिच्या आरोग्यासाठी वनतारा वाइल्डलाइफ रेस्क्यू अँड रिहॅबिलिटेशन सेंटर, जामनगर (गुजरात) येथे हलवण्याचा निर्णय दिला, जिथे तिची चांगली काळजी घेतली जाईल.
स्थानिकांनी या निर्णयाला का विरोध केला?
महादेवी गेली ३६ वर्षे नांदणी मठात होती आणि ती गावकऱ्यांसाठी फक्त हत्तीण नसून “मठाची लेक” आणि धार्मिक-सांस्कृतिक प्रथांचा भाग होती. तिला “ग्रामदेवतेची सावली” मानलं जात होतं. तिच्या जाण्याने स्थानिकांच्या भावना दुखावल्या गेल्या, कारण ती गावाच्या आध्यात्मिक आणि सामाजिक जीवनाचा महत्त्वाचा भाग होती. यामुळे कोल्हापूरकरांनी आंदोलने, स्वाक्षरी मोहिमा आणि पदयात्रा काढून तिला परत आणण्याची मागणी केली.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.