digital products downloads

महादेव मुंडे प्रकरणात कराड कुटुंबीयांचा हात!: बीडमध्ये ‘हम करेसो कायदा’ची स्थिती, पोलिस गप्प का?, जितेंद्र आव्हाडांचे टीकास्त्र – Mumbai News

महादेव मुंडे प्रकरणात कराड कुटुंबीयांचा हात!:  बीडमध्ये ‘हम करेसो कायदा’ची स्थिती, पोलिस गप्प का?, जितेंद्र आव्हाडांचे टीकास्त्र – Mumbai News


ज्ञानेश्वरी मुंडेंचे प्रकरण अतिशय गंभीर आहे. महादेव मुंडेंचा खून कुणी केला हे पोलिस खात्याला माहिती आहे. ज्यांच्यासमोर हे सर्व झाले त्या बाळा बांगर यांनी एक निवेदन पोलिसांना दिले आहे. वाल्मीक कराड आणि त्यांचा मुलगा काय बोलत होते, त्यानंतर महादेव मुंड

.

जितेंद्र आव्हाड म्हणाले की, बाळा बांगर यांनी काल पुन्हा जाऊन पोलिसांना सांगितले. यामुळे महादेव मुंडेंच्या खूनामागे वाल्मीक कराड आणि त्याचा मुलाचा हात आहे हे कुठे तरी स्पष्ट होत आहे. पण पोलिस काही करत नाही. वाल्मीक कराडचा मकोका रद्द होणार आहे, ते फक्त देशमुख कुटुंबीयांच्या दबावामुळे आणि बातमी बाहेर आल्याने मकोका रद्द केला नाही असा आरोप आव्हाडांनी केला आहे.

म्हणून कराड कुटुंबीयांनी महादेव मुंडेंची विकेट काढली

जितेंद्र आव्हाड म्हणाले की, महादेव मुंडे आणि वाल्मीक कराड यांच्या कुटुंबियांचे एका जमिनीवरुन वाद झाले होते. महादेव मुंडे प्लॉटिंग करत विकायचा. त्यांना मी चांगला ओळखत होतो. प्लॉट च्या वादातून कराड यांच्या कुटुंबियांना वाटले हा स्वत:ला खूप शहाना समजतो त्याची विकेट काढली.या प्रकरणाकडे कुणीही लक्ष देणार नाही. बाळा बांगर जास्त बोलतो म्हणून त्याच्यावर 7 केस दाखल केल्या. बीडमध्ये पोलिस प्रशासन अस्तित्वातच नाही. हम करेसो कायदा अशी परिस्थिती तिथे आहे. अनेक ज्ञानेश्वरी सारख्या बहिणी आहेत ज्यांचे कुंकू पुसले गेले आहे. महादेव मुंडे प्रकरणी पुरावे मिळणारच नाही. त्यांची पत्नी खंगून गेले आहे. खून माफ होणार असेल तर यापेक्षा मोठी दुसरी गोष्ट नाही.

व्यवस्थेवर हे पाशवी बलात्कार सुरू

जितेंद्र आव्हाड म्हणाले की, राज्य सरकार या विषयाकडे गांभीर्याने पाहत नाही. बहुमताच्या जीवावर एकंदर व्यवस्थेवर हे पाशवी बलात्कार करत आहेत. आम्हाला बहुमत दिले आहे असे बोलून कशालाच न्याय मिळत नाही. सोमनाथ सूर्यवंशी प्रकरण आम्ही लावून धरले होते पण शासनाने ऐकले नाही, शेवटी कोर्टाने त्यांवर खून आहे असे सांगितले. आम्ही कायद्यानुसार सदस्य बोलतो ते सत्य आहे असे मान्य करावे लागते. पण ते होते नाही.

मी मरायला तयार आहोत

जितेंद्र आव्हाड म्हणाले की, पडळकर यांच्या बद्दल मला काही बोलायचे नाही. दरवाजा उघडला तेव्हा मला कमी लागले पण संतोष देशमुख यांचे बंधू यांना जास्त दुखापत झाली. ते जर म्हणत असतील की कुणी समोर आले तर गाडी अंगावर टाकू तर आम्ही पामर आहोत, हा सत्तेचा माज दिसतो आहे. आम्ही रस्त्यावरुन येत असताना आम्हाला शिवी द्यायची. तुम्ही सत्तेत आहात आम्ही शिव्या खाऊ, विधीमंडळाच्या परिसरात हे होत असेल तर अध्यक्षांना संसदीय भाषा म्हणून त्याला मान्यता द्यावी. मी काही कुणाविरोधात तक्रार करणार नाही. गाडी अंगावर घालू नका मला गोळ्या घाला आम्ही तयार बसलो आहोत.

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Uniq Art Store India

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Uttarakhand News Doonited
Social media & sharing icons powered by UltimatelySocial
Instagram
WhatsApp