
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमी, दादर-मुंबई येथे येणाऱ्या खासगी वाहनांना टोलमाफी मिळावी, अशी मागणी खासदार बळवंतराव वानखडे यांच्या नेतृत्वाखालील एका शिष्टमंडळाने केली आहे. त्यांनी याबाबतचे निवेदन केंद्रीय रस्
.
देशभरातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे हजारो अनुयायी दरवर्षी ६ डिसेंबर रोजी त्यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमीवर आदरांजली वाहण्यासाठी येतात. यातील मोठा वर्ग खासगी किंवा प्रवासी वाहनांनी लांबचा प्रवास करून मुंबईत पोहोचतो.
मुंबईकडे येताना विविध महामार्गांवर लागणाऱ्या टोलमुळे अनुयायांवर आर्थिक भार पडतो. हा आर्थिक भार कमी करण्यासाठी, ६ डिसेंबर रोजी मुंबईत येणाऱ्या वाहनांना एक दिवसाची टोलमाफी जाहीर करावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
हे निवेदन सादर करताना खासदार वर्षा गायकवाड, खासदार डॉ. कल्याण काळे, खासदार डॉ. शिवाजी काळगे आणि खासदार रवींद्र चव्हाण यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.
केंद्र सरकारने या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देऊन बाबासाहेबांच्या अनुयायांच्या भावनांचा आदर करावा, अशी अपेक्षा शिष्टमंडळाने व्यक्त केली आहे.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.



