digital products downloads

महाराष्ट्राच्या राजकारणात लेटर बॉम्बचा धमाका! ठाकरेंच्या शिवसेनेतील बड्या नेत्याने पत्र व्हायरल; पत्रात खळबळजनक दावे

महाराष्ट्राच्या राजकारणात लेटर बॉम्बचा धमाका! ठाकरेंच्या शिवसेनेतील बड्या नेत्याने पत्र व्हायरल; पत्रात खळबळजनक दावे

Shiv Sena Uddhav Balasaheb Thackeray : शिवसेना आणि मनसे एकत्र येणार याची जोरदार चर्चा महाराष्ट्राच्या राजकारणात रंगली आहे. तर, दुसरीकडे ठाकरेंच्या शिवसेनेला गळती लागली आहे. सुधाकर बडगुजर यांनी भाजप पक्षात प्रवेश केला. शिवसेनेच्या अनेक नेत्यांनी उद्दव ठाकरेंची साथ सोडली आहे तर, अवके नेते पक्ष सोडण्याच्या वाटेवर आहेत. अशातच शिवसेनेच्या बड्या नेत्याने एका जाहीर पत्राद्वारे ठाकरेंच्या शिवसेनेला लागलीय गळती का लागले याची कारणे सांगितली आहेत. 

जालन्यातील ठाकरे गटाचे नेते डॉ. संजय लाखेपाटील यांनी शिवसेना सचिव पदाचा दिला राजीनामा आहे. एका खरमरीत पत्रातून लाखे पाटील यांनी उद्धव ठाकरेंना पक्षातील वस्तुस्थिती कथन केली आहे. या पत्रात पक्षाच्या पडझडीची कारणं आणि नेत्यांची उदासीनता याबाबत प्रखर शब्दात वस्तुनिष्ठ मांडणी करण्यात आली आहे. एका पत्रातून ठाकरेंच्या शिवसेनेतील अंतर्गत धुसफुसीचं जळजळीत वास्तव त्यांनी स्पष्ट केले आहे. 

लोकसभेच्या निवडणुकीपूर्वी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी मला सांगितले पक्ष प्रवेश करा. जालना लोकसभा सीट आपण सोडून घेऊ शिवसेनेला आणि सांगली काँग्रेसला देऊ  असं सांगून त्यांच्या शब्दा खातर मी शिवसेनेत प्रवेश केला.  मी अनेकदा संजय राऊत यांना जालना सोडा असं सांगितलं. संजय राऊत हा आपला वेगळा अजेंडा चालवतात. संजय राऊत यांनी तडजोड केली. सांगली शिवसेनेकडे ठेवली. सांगली मतदारसंघांमध्ये शिवसेनेची एकही शाखा नाही. आणि पराभव अटळ आहे. कमकुवत उमेदवार दिला. तरी त्यानंतर मला सचिव पदाची जबाबदारी दिली. मी निवडणुकीमध्ये संपूर्ण काम केले. 

मला संघटनात्मक कामापासून वगळण्यात आलं. राज्य लेव्हलवर असेल किंवा जिल्ह्यावर मला बोलावलं नाही.  गेल्या आठ दहा दिवसात कार्यक्रम राबवण्यात आले तो आमचा आहे. आमचा कार्यक्रम दानवे यांनी अलगद उचलला. दानवे यांनी स्वतःचे नेतृत्व पुढे ढकलण्यात प्रयत्न केला. आम्हाला डावलण्याचा प्रयत्न केला. अंबादास दानवे यांनी नियुक्ती यामध्ये स्वतःची मनमानी केली असे अनेक आरोप त्यांनी केले. 

.. म्हणून ठाकरेंच्या शिवसेनेला लागलीय गळती? काय आहे पत्रात ? 

•  १४ महिन्यांपूर्वी उद्धव ठाकरे यांनी जालना लोकसभेचे तिकीट व कार्याची हमी दिली होती, परंतु ती पूर्ण झाली नाही, असा आरोप.
•  संजय राऊत यांनी जयंत पाटील यांच्यासोबत समझोता करून सांगलीत पराभवाला कारणीभूत ठरल्याचा दावा.
•  अंबादास दानवे यांनी जिंकणारी जालना जागा पक्षाकडून दूर ठेवली, असा आरोप.
. रावसाहेब दानवे यांच्या प्रति शिष्य धर्माचं  पालन करण्यासाठी पक्षाशी प्रताडना केल्याचा अंबादास दानवेंवर केला आरोप. 
•  गेल्या १३-१४ महिन्यांत संघटनात्मक जबाबदारी नाकारून बेदखल करण्यात आल्याची तक्रार.
•  दै. सामनामध्ये नाव नोंदवून न घेणे आणि मानहानीकारक वागणूक यामुळे राजीनामा, असे स्पष्ट.
•  मराठवाड्यातील संघटना कमकुवत होत असल्याचा इशारा; उद्धव ठाकरेंना शुभेच्छा व्यक्त करत पक्षाला दिली सोडचिठ्ठी.

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Uniq Art Store India

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Uttarakhand News Doonited
Social media & sharing icons powered by UltimatelySocial
Instagram
WhatsApp