digital products downloads

महाराष्ट्रातील दोन बड्या नेत्यांचा पवारांच्या दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यास विरोधच; हे नेते आहेत तरी कोण?

महाराष्ट्रातील दोन बड्या नेत्यांचा पवारांच्या दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यास विरोधच; हे नेते आहेत तरी कोण?

Maharashtra Politics :  राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये विलीनीकरणावरुन मतभेद निर्माण झाल्याची माहिती मिळत आहे.महाराष्ट्रातील दोन बड्या नेत्यांचा पवारांच्या दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यास विरोध आहे. पवारांच्या दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्या तर महाराष्ट्राच्या राजकारणात दोन मुद्द्यांनरुन मोठा वाद होऊ शकते. हे मुद्दे कोणते हे देखील या नेत्यांनी सांगितले आहे. 

राष्ट्रवादी (SP)ला सोबत घेण्यास पक्षातील दोन वरिष्ठ नेत्यांचा विरोध असल्याची माहिती मिळत आहे. पक्षात दोन सत्तास्थानं नको अशी पक्षातील दोन वरिष्ठ नेत्यांची भूमिका आहे. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार अशा चर्चा मागील अनेक दिवसांपासून राजकीय वर्तुळात सुरू आहेत. मात्र, आता दादांच्याच राष्ट्रवादीतच विलिनीकरणावरून मतभेद असल्याची माहिती मिळतेय. शरद पवारांच्या राष्ट्रवादीला सोबत घेण्यास दादांच्या राष्ट्रवादीमधील दोन नेत्यांनी विरोध केल्याची माहिती आहे. पक्षात दोन सत्तास्थानं नको म्हणून अशी भूमिका दादांच्या राष्ट्रवादीमधील वरिष्ठ नेत्यांनी घेतली आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार राष्ट्रवादी काँग्रेस गटातच विलीनीकरणाच्या मुद्द्यावर तीव्र मतभेद निर्माण झाले आहेत. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यानंतर केंद्रात प्रफुल पटेल, सुप्रिया सुळे यांच्यात मंत्रिपदावरून रस्सीखेच निर्माण होण्याची शक्यता. विलिनीकरण झाल्यास जयंत पाटील यांना मंत्रिपद द्यायचं की प्रदेशाध्यक्षपद? याबाबत देखील संभ्रम होऊ शकतो अस विलिनीकरणाला विरोध करणाऱ्या राष्ट्रवादीच्या नेत्यांचे म्हणणे आहे. 

राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या चर्चांवरून संजय राऊतांनी पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांवर टीकास्त्र डागलंय. काहींना भाजपसोबत जाण्याची तहान लागल्या खोचक  टोला संजय राऊतांनी लगावला आहे. तहान लागली म्हणून कुणी गटाराचं पाणी पित नाही असा टोला खासदार संजय राऊत यांनी राष्ट्रवादी (SP)च्या नेत्यांना लगावला. दरम्यान शरद पवार सत्तेस आल्यास काही लोकांची संधी हुकणार असं म्हणत संजय शिरसाट यांनी ठाकरेंच्या शिवसेनेवर निशाणा साधलाय.

शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं अजित पवारांच्या राष्ट्रवादीत विलीन व्हावं असं विधान रामदास आठवले यांनी केलंय. अजित पवारांकडे राष्ट्रवादी पक्ष असल्याचंही रामदास आठवले यांनी म्हटलंय. तसंच दोन्ही पक्ष एकत्र आल्यास आनंद होईल अशी
प्रतिक्रिया देखील त्यांनी दिली.

 

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Uniq Art Store India

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Uttarakhand News Doonited
Social media & sharing icons powered by UltimatelySocial
Instagram
WhatsApp