digital products downloads

महाराष्ट्रातील प्रायव्हेट कंपन्यांच्या कामगारांना 12 तास ड्युटी, 144 तासांचा ओव्हरटाईम; सरकार कामगार कायद्यात 5 मोठे बदल होणार?

महाराष्ट्रातील प्रायव्हेट कंपन्यांच्या कामगारांना 12 तास ड्युटी, 144 तासांचा ओव्हरटाईम; सरकार कामगार कायद्यात 5 मोठे बदल होणार?

Maharashtra Work Hours Extension Labour Law : महाराष्ट्रातील प्रायव्हेट कंपन्यांमध्ये काम करणाऱ्यांना आता आणखी जादा वेळ काम करावे लागू शकते. महाराष्ट्र सरकार राज्यातील खाजगी कंपन्यांमध्ये कामाचे तास वाढवण्याची योजना आखत आहे. सध्या सरकार आणि कंपन्यांमध्ये चर्चा सुरू आहे आणि जर यावर निर्णय झाला तर 9 तासांऐवजी 10 तास दररोज काम करावे लागेल. काही कंपन्यांच्या कामगारांना 12 तास ड्युटी, 144 तासांचा ओव्हरटाई करावा लागू शकतो.

Add Zee News as a Preferred Source

सरकार महाराष्ट्र दुकान आणि आस्थापना (रोजगाराचे नियमन आणि सेवाशर्ती) कायदा, 2017 मध्ये बदल करण्याचा विचार करत आहे. याअंतर्गत दुकाने, हॉटेल्स आणि कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे कामाचे तास वाढवण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला आहे. राज्याच्या कामगार विभागानेही मंत्रिमंडळाच्या बैठकीत या प्रस्तावावर चर्चा केली आणि जर सर्व काही व्यवस्थित झाले तर लवकरच हा नवीन नियम लागू केला जाऊ शकतो.

पाच मोठ्या बदलांची तयारी

या प्रस्तावाअंतर्गत, कामगार विभाग 2017 च्या कायद्यात 5 मोठे बदल करण्याचा विचार करत आहे. यातील सर्वात महत्त्वाचे म्हणजे कामाचे तास 8 तासांवरून 9 तासांपर्यंत वाढवणार आहे. कायद्याच्या कलम 12 मध्ये असे म्हटले आहे की कोणत्याही कंपनीतील कोणताही कर्मचारी 10 तासांपेक्षा जास्त काम करणार नाही. कायद्यात सतत 6 तास काम करण्याची आणि 30 मिनिटांचा ब्रेक घेण्याची तरतूद देखील आहे. कायद्याच्या सध्याच्या तरतुदीनुसार, सतत फक्त 5 तास काम करण्याची तरतूद आहे.

कामगार विभागाने ओव्हरटाइम मर्यादा वाढवण्याचा प्रस्ताव मांडला आहे, जो तिमाहीत 125 वरून 144 तासांपर्यंत वाढवण्याचा आहे. सध्या कोणताही कर्मचारी ओव्हरटाइमसह दररोज जास्तीत जास्त 10.5 तास काम करू शकतो, तर नवीन प्रस्तावात हा कालावधी 12 तासांपर्यंत वाढवला जाईल. आणीबाणीच्या काळात, सध्याची 12 तासांची वेळ मर्यादा रद्द केली जाईल आणि अमर्यादित केली जाईल. याचा अर्थ असा की अशा परिस्थितीत कर्मचारी 24 तास काम करू शकतील.

कोणत्या प्रकारच्या खाजगी कंपन्यांना हा नियम लागू होणार?

हा प्रस्ताव 20 पेक्षा जास्त कर्मचारी काम करणाऱ्या कंपन्यांना लागू होईल. सध्या हा नियम 10 कर्मचाऱ्यांसह असलेल्या कंपन्या आणि दुकानांना लागू आहे. सध्या सरकारला यावर अधिक स्पष्टीकरण हवे आहे आणि त्यांचा हेतू असा आहे की नियम बनवण्यापूर्वी त्याच्या सर्व पैलूंचा विचार केला पाहिजे. अलिकडेच लार्सन अँड टुब्रोचे अध्यक्ष एसएन सुब्रमण्यम यांनी आठवड्यातून 90 तास काम करण्याबद्दल आणि आठवड्याच्या शेवटी म्हणजेच रविवारीही काम करण्याबद्दल बोलून हा वाद सुरू केला होता.

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Uniq Art Store India

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Uttarakhand News Doonited
Social media & sharing icons powered by UltimatelySocial
Instagram
WhatsApp