digital products downloads

महाराष्ट्रात एकट्या जरांगेंनाच राहायचे आहे काय?: मंत्री छगन भुजबळ यांना नेपाळला पाठवण्याच्या जरांगेंच्या टीकेवर वडेट्टीवार यांचा सवाल – Mumbai News

महाराष्ट्रात एकट्या जरांगेंनाच राहायचे आहे काय?:  मंत्री छगन भुजबळ यांना नेपाळला पाठवण्याच्या जरांगेंच्या टीकेवर वडेट्टीवार यांचा सवाल – Mumbai News


मराठा आरक्षणावर सातत्याने टीका करणाऱ्या छगन भुजबळांना नागालँड किंवा नेपाळला पाठवा, असा सूर आळवणाऱ्या मनोज जरांगेंच्या टीकेचे आता संतप्त पडसाद उमटत आहेत. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी शनिवारी या प्रकरणी जरांगेंचा खरपूस समाचार घेत महारा

.

छगन भुजबळांनी नुकताच मनोज जरांगे व त्यांच्या समर्थकांवर मुंबईत जाऊन हैदोस घातल्याचा आरोप केला होता. त्यानंतर जरांगेंनी त्यांना नेपाळला नेऊन सोडण्याची भाषा केली होती. देवाने भुजबळांना अक्कल दिली असती तर खूप बरे झाल असते. मुंबईत मराठ्यांची मुले गेली होती. त्यातून महाराष्ट्राला एक संस्कृती दिसली. ही पोरेच मुंबईचे खरे मालक आहेत. तेथील लोक केवळ पाहुणे आहेत. हा (भुजबळ) ही तिथे शोभत नाही. त्यांना नेपाळ, नागालँड किंवा इंग्लंडला नेऊन सोडले पाहिजे, असे ते म्हणाले होते. पत्रकारांनी शनिवारी याविषयी विजय वडेट्टीवार यांना छेडले असता त्यांनी वरील शब्दांत या दोन्ही नेत्यांना भान राखून बोलण्याचा सल्ला दिला.

आपल्या हक्काचे मागण्याचा सर्वांना अधिकार

विजय वडेट्टीवार म्हणाले, कुणाला नेपाळला नेऊन सोडायचे हे ठरवणारे मनोज जरांगे कोण? ओबीसी चळवळीत काम करणाऱ्यांना परदेशात पाठवायचे असेल, तर एकट्या जरांगेंनाच महाराष्ट्रात राहायचे आहे काय? अशा प्रकारचे विधान करणे मनोज जरांगे यांनी टाळले पाहिजे. आपल्या हक्काचे मागायचा कुणालाही अधिकार आहे. आम्ही ओबीसी आहोत, तर आमच्या समाजबांधवांचे संरक्षण व त्यांच्या न्यायिक व घटनात्मक अधिकारांसाठी लढणे आमचा हक्क आहे. यासंदर्भात भुजबळांसह जरांगेंनीही वैयक्तिक टीका करणे टाळले पाहिजे.

विजय वडेट्टीवार यांनी यावेळी भरत कराड नामक तरुणाने ओबीसी आरक्षणासाठी दिलेल्या प्राणांच्या आहुतीवरही भाष्य केले. लातूरचा भरत कराड हा ओबीसी चळवळीत काम करणारा सक्रीय कार्यकर्ता होता. तो गरीब होता. ऑटो चालवत होता. त्यानंतरही ओबीसींच्या प्रत्येक मेळाव्याला व बैठकीला तो जात होता. ओबीसींच्या आरक्षणासाठी लढत होता. त्याने सरकारच्या मराठा आरक्षणाच्या निर्णयामुळे त्याने आपली जीवनयात्रा संपवली. मी सोमवारी त्याच्या कुटुंबीयांची भेट घेणार आहे, असे ते म्हणाले.

भरत कराड हा सरकारच्या चुकीच्या निर्णयाचा बळी

विजय वडेट्टीवार यांनी यावेळी सरकारकडे भरत कराडच्या कुटुंबीयांना मराठा आरक्षणासाठी आत्महत्या करणाऱ्या लोकांसारखीच भरीव मदत करण्याची मागणी केली. भरत कराड या ओबीसी तरुणाने आत्महत्या करताना जे लिहून ठेवले आणि मागणी केली, त्यामुळे या सरकारचे डोळे उघडतील. सरकार या प्रकरणी एक प्रकारचे सोंग घेत आहे. ओबीसींवर झालेला अन्याय व ज्यांचा काहीही संबंध नाही अशा लोकांचा झालेला शिरकाव, हे पाहता मला वाटते की, त्या कुटुंबाला आधार देण्याची व सरकारने त्यांची जबाबदारी घेण्याची गरज आहे. कारण, सरकारच्या चुकीच्या निर्णयाचा हा बळी आहे. सरकारचा या आत्महत्येला जबाबदार आहे असा आमचा स्पष्ट आरोप आहे. त्यामुळे त्याच्या कुटुंबीयांना भरपूर मदतही केली पाहिजे आणि सरकारने त्या जीआरचा पुनर्विचारही केला पाहिजे, असे ते म्हणाले.

आपण आवश्यकता पडली तर रस्त्यावर उतरू. संघर्ष करू. आपल्या हक्कांसाठी आत्महत्या हा पर्याय नाही. आत्महत्या करून आपले जीवन संपवण्यापेक्षा आपण सर्वजण जे काही चुकीचे घडेल त्याविरोधात रस्त्यावर लढाई करू. त्यासाठी तयार राहा. परंतु कुणीही आत्महत्येचे पाऊल उचलू नका, असेही विजय वडेट्टीवार यांनी यावेळी ओबीसी तरुणांना टोकाचे पाऊल न उचलण्याचे आवाहन करताना म्हणाले. दरम्यान, ओबीसींच्या आजच्या बैठकीला ओबीसींचे 30-35 प्रमुख नेते हजर राहणार असल्याची माहितीही वडेट्टीवार यांनी यावेळी दिली.

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Uniq Art Store India

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Uttarakhand News Doonited
Social media & sharing icons powered by UltimatelySocial
Instagram
WhatsApp