digital products downloads

महाराष्ट्रात पावसाचा धुमाकूळ, कुठे यलो अलर्ट तर कुठे रेड अलर्ट; 4 दिवस समुद्राला मोठी भरती

महाराष्ट्रात पावसाचा धुमाकूळ, कुठे यलो अलर्ट तर कुठे रेड अलर्ट; 4 दिवस समुद्राला मोठी भरती

अनेक दिवसांच्या विश्रांतीनंतर, देशाची आर्थिक राजधानी मुंबईत अखेर मुसळधार पाऊस सुरू झाला आहे. सोमवारीपासून अनेक भागात मुसळधार पाऊस पडला, गुरुवारी आणि शुक्रवारी ढगाळ वातावरण राहिले आणि अनेक भागात मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस पडला. मुंबईसह रायगड जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरु झाला आहे.  जिल्ह्याला दोन दिवसांचा रेड अलर्ट जाहीर केला आहे. जिल्ह्यात अलिबाग, मुरुड, रोहा, श्रीवर्धन, माणगाव, म्हसळा आणि उरण या तालुक्यांना पावसाचा जोरदार तडाखा बसला आहे. 

 

रायगड जिल्ह्यात गेल्या मुसळधार पावसाने हजेरी लावली, किनारपट्टीवरील तालुक्यांमध्ये पावसाचा जोर दिसून आला. त्यामुळे जनजिवन विस्कळीत झाले. दरम्यान हवामान विभागाकडून येत्या ४८ तासांसाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळे प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. 

जिल्ह्यात अलिबाग, मुरुड, रोहा, श्रीवर्धन, माणगाव, म्हसळा आणि उरण या तालुक्यांना पावसाचा जोरदार तडाखा बसला, या तालुक्यांमध्ये पावसाची संततधार कायम होती. अधुनमधून वादळी वाऱ्यांसह पावसाच्या जोरदार सरी कोसळत होत्या. त्यामुळे सखल भागात पाणी साचणे, वृक्ष उन्मळून पडणे, वीज पुरवठा खंडीत होणे या सारख्या घटना घडल्या.

 

जिल्ह्यात बुधवारी सकाळी आठ वाजे पर्यंत संपलेल्या २४ तासात जिल्ह्यात सरासरी ९१ मिमी पावसाची नोंद झाली. रोहा येथे सर्वाधिक १५९ मिमी पाऊस नोंदवला गेला. तळा १५० मिमी, मुरुड १२४ मिमी, पेण १२० मिमी, माणगाव ११५ मिमी, श्रीवर्धन ११६ मिमी, म्हसळा १०९ मिमी, तर अलिबाग येथे ९६ मिमी पावसाची नोंद झाली.

 

गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्यात पावसाचा जोर पुन्हा वाढला आहे. त्यामुळे आंबा, सावित्री, कुंडलिका, पाताळगंगा नद्या नाल्यांच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे. बुधवारी सकाळच्या सत्रात कुंडलिका नदीने इशारा पातळी ओलांडली होती. त्यामुळे रोहा शहर आणि नदी किनाऱ्यावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला होता. भिरा धरणातून विसर्ग सुरु असल्याने कुंडलिका नदी दुथडी भरून वाहत होती. बुधवारी दुपार पर्यंत जिल्ह्यातील बहुतांश भागात पावसाची संततधार सुरू होती. त्यामुळे जनजीवन विस्कळीत होते.

हवामान खात्याकडून अलर्ट 

दरम्यान प्रादेशिक हवामान विभागाकडून गुरुवार दिनांक २४ आणि शुक्रवारी दिनांक २५ जुलैसाठी रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळे आपत्ती व्यवस्थापन विभागाने नदी किनाऱ्यांवरील तसेच डोंगर उतारावरील गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. आपत्कालीन परिस्थितीत ०२१४१-२२२११८ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.

सलग ४ दिवस समुद्राला मोठी भरती

भरतीवेळी समुद्रकिनारी जाणे टाळावे तसेच यासंदर्भात प्रशासनाकडून जारी इतर सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्याचे महानगरपालिका प्रशासनाकडून आवाहन

 

गुरुवार, दिनांक २४ जुलै २०२५ ते रविवार, दिनांक २७ जुलै २०२५ या कालावधीदरम्यान सलग ४ दिवस समुद्राला मोठी भरती येणार आहे. तर, दिनांक २६ जुलै २०२५ रोजी समुद्रात सर्वात मोठी म्हणजे ४.६७ मीटर इतक्या उंचीची लाट उसळणार आहेत. भरती काळादरम्यान नागरिकांनी समुद्रकिनारी जाऊ नये, तसेच, या अनुषंगाने प्रशासनाकडून वेळोवेळी देण्यात येणाऱ्या सुचनांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिकेडून नागरिकांना करण्यात येत आहे. 

 जुलै २०२५ महिन्यातील भरतीसंदर्भात माहिती

१. गुरुवार, दि. २४.०७.२०२५    सकाळी – ११.५७ वा. लाटांची उंची (मीटर) – ४.५७

२. शुक्रवार, दि. २५.०७.२०२५ दुपारी – १२.४० वा. लाटांची उंची (मीटर) – ४.६६

३. शनिवार, दि. २६.०७.२०२५ दुपारी – ०१.२० वा. लाटांची उंची (मीटर) – ४.६७

४. रविवार, दि. २७.०७.२०२५ दुपारी – ०१.५६ वा. लाटांची उंची (मीटर) – ४.६०

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Uniq Art Store India

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Uttarakhand News Doonited
Social media & sharing icons powered by UltimatelySocial
Instagram
WhatsApp