
Vote Chori : लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी कालच पत्रकार परिषद घेऊन मतदारांची नावं वाढवल्याचा आणि काही ठिकाणी कमी केल्याचा आरोप केला होता. त्यावरून राजकारण तापलेलं असतानाच आता महाराष्ट्रातील वाढलेल्या मतदारांचा आकडा समोर आला आहे. मागल्या 7 महिन्यांमध्ये महाराष्ट्रात तब्बल 14 लाख 71 हजार मतदारांची वाढ झाली आहे. त्यानरूनही आता चर्चा सुरू झाली आहे.
लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी मतचोरीचा आरोप करत निवडणूक आयोगावर आरोपांच्या फैरी झाडायला सुरूवात केली आहे. कालच राहुल गांधींनी कर्नाटकातील आळंदमध्ये मतदार कमी केले आणि महाराष्ट्रातील राजुरामध्ये मतदार वाढवण्यात आल्याचा आरोप केला आहे. त्यातच आता महाराष्ट्रातील वाढलेल्या मतदारांची आकडेवारी निवडणूक आयोगाने जाहिर केली आहे.
विधानसभा निवडणुकीनंतर आतापर्यंत महाराष्ट्रात तब्बल 14 लाख 71 हजार मतदार वाढले आहेत. यात सर्वाधिक मतदार वाढ ठाण्यात झाली आहे. तर पुणे हे दुसऱ्या क्रमांकावर असल्याचा पहायला मिळत आहे. याआधी 2024 च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीदरम्यान अवघ्या 6 महिन्यांमध्ये 40 लाख 81 हजार मतदार वाढले होते. त्यावरून विरोधकांनी अनेक प्रश्न उपस्थि केल्याचं पाहायला मिळत आहे.
7 महिन्यांत 14 लाख मतदार वाढले
– विधानसभा 2024 ला मतदारांची संख्या – 9 कोटी 70 लाख
– नोव्हेंबर 2024 ते जुलै 2025 या 7 महिन्यांत 14 लाख 71 हजार मतदारांची वाढ
– मतदारांच्या मूळ संख्येत 18 लाख 80 हजारांची वाढ झाली
– त्यातून 4 लाख 9 हजार मतदारांची नावं वगळली
– या मतदार वाढीनंतर राज्यातील एकूण पात्र मतदार – संख्या 9 कोटी 84 लाख
– ठाणे जिल्ह्यात सर्वाधिक 2 लाख 71 हजार वाढ
– पुणे जिल्ह्यात 2 लाख 26 हजार मतदारवाढ
एकीकडे निवडणूक आयोगाने ही आकडेवारी जाहीर केलीय तर दुसरीकडे राहुल गांधींच्या आरोपांचा दाखला देत राज ठाकरेंनी कार्यकर्त्यांना सतर्क राहण्याच्या सुचना केल्या आहेत.
राज ठाकरे काय म्हणाले?
मतदार यादीतील बनावट मतदार शोधा, याद्या तपासून घ्या, बुथपातळीवर काम करा अशा राज ठाकरेंनी कार्यकर्त्यांना दिलेत. तर 18 वर्ष पूर्ण झालेले तरूण मतदार नोंदणी करत असतात. मतदारवाढ ही अविरत चालणारी प्रक्रीया असल्याचं राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी म्हटलं आहे.
निवडणूक आयोगाने राज्यातील पात्र मतदारांची यादी जाहिर केली आहे. ही यादी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी अंतिम असणार आहे. मात्र दुसरीकडे राहुल गांधींच्या आरोपांनतर या मतदारवाढीकडेही विरोधक संशयाने पाहताना दिसताहेत.
FAQ
1. महाराष्ट्रातील मतदारांची वाढ किती झाली आहे आणि कालावधी काय आहे?
महाराष्ट्रात २७ नोव्हेंबर २०२४ ते ३० जून २०२५ या सात महिन्यांत १४.७१ लाख मतदारांची वाढ झाली आहे. यात १८.८० लाख नव्या मतदारांची नोंदणी झाली, तर ४.०९ लाख नावे वगळली गेली. यानंतर राज्यातील एकूण पात्र मतदारांची संख्या ९ कोटी ८४ लाख झाली आहे.
2. कोणत्या जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक मतदारवाढ झाली?
ठाणे जिल्ह्यात सर्वाधिक २.२५ लाख मतदारांची वाढ झाली (एकूण २.७१ लाख नवे, ४५,८०० वगळले). दुसऱ्या क्रमांकावर पुणे आहे, जिथे १.८२ लाख वाढ (एकूण २.२६ लाख नवे, ४३,९६१ वगळले). मुंबई उपनगरात ९५,६३० आणि मुंबई शहरात १८,७४१ नवे मतदार जोडले गेले.
3. राहुल गांधींनी कोणते आरोप केले आहेत?
लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधींनी पत्रकार परिषदेत मतचोरीचे आरोप करत निवडणूक आयोगावर टीका केली. त्यांनी कर्नाटकातील आळंद मतदारसंघात ६,०१८ मतदारांची नावे वगळण्याचा प्रयत्न झाल्याचा आणि महाराष्ट्रातील राजुरा मतदारसंघात ६,८५० बनावट मतदार जोडले गेल्याचा दावा केला. त्यांनी हे ऑटोमेटेड सॉफ्टवेअरद्वारे झाल्याचे सांगितले आणि निवडणूक आयोगाला कर्नाटक पोलिसांना माहिती देण्याची मागणी केली.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.