digital products downloads

महाराष्ट्रासाठी खूशखबर! पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर शिंदेंकडून मोठी घोषणा, परिपत्र काढण्याच्या सूचना

महाराष्ट्रासाठी खूशखबर! पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर शिंदेंकडून मोठी घोषणा, परिपत्र काढण्याच्या सूचना

ST Fair Hike: परिवहन विभागाकडून पुरग्रस्त महाराष्ट्राला दिलासा मोठा दिलासा देण्यात आला आहे. दिवाळीसाठी करण्यात आलेली एसटीची भाडेवाढ तत्काळ रद्द करण्याच्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या आहेत. एकनाथ शिंदे यांच्या सूचनेनंतर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी भाडेवाढ मागे घेण्याचे आदेश दिले होते. दिवाळीच्या 15 ऑक्टोबर ते 5 नोव्हेंबर या कालावधीमध्ये दरवर्षी प्रमाणे एसटीच्या तिकिट दरात 10 टक्के भाडेवाढ जाहीर करण्यात आली होती. मात्र महाराष्ट्रातील पूर परिस्थिती लक्षात घेऊन ही भाडेवाढ रद्द करावी असं एकनाथ शिंदे यांनी सुचवलं होतं. त्यानंतर प्रताप सरनाईक यांनी ही भाडेवाढ रद्द करण्याचे एसटी प्रशासनाला आदेश दिले आहेत.

Add Zee News as a Preferred Source

दिवाळीच्या तोंडावर एसटीकडून कऱण्यात आलेली 10 टक्के भाडेवाढ रद्द करत असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेत असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांना मी यावेळी अपवाद केला पाहिजे असं सांगितलं. पूरपरस्थितीमुळे  10 टक्के भाडेवाढ रद्द करावी असं मी त्यांना सांगितलं. त्यानुसार आता ते परिपत्रक काढत आहेत. त्यानंतर भाडेवाढ रद्द होईल आणि त्यामुळे लोकांना मोठा दिलासा मिळेल असं ते म्हणाले आहेत. 

दरवर्षी एसटी महामंडळ दिवाळीआधी 10 टक्के दरवाढ करतं. पण सध्याची स्थिती लक्षात घेता एसटी दरवाढ रद्द झाली आहे. 

दरम्यान एकनाथ शिंदेंना यावेळी उद्धव ठाकरेंवर टीका करताना म्हटलं की, “माझं एवढंच सांगणं आहे ते स्वतः मुख्यमंत्री असताना किती शेतकऱ्यांचे अश्रू बांधावर पुसले हे सगळ्यांना माहिती आहे नियमित कर्जफेड करणारे शेतकरी त्यांना ५० हजार इन्सिन्टींव्ह कोट त्यांनी दिले. त्यांनी टीका करण्यापेक्षा ते स्वतः काय केले हे पाहावं”. 

“मुख्यमंत्री, आम्ही, मंत्री सगळे बांधावर गेलो. आम्ही आमच्या डोळ्यांनी स्थिती पाहिली. हे शेतकऱ्यांवर आलेलं संकटफार मोठं आहे. गेल्या कित्येक वर्षात इतका मोठा पाऊस पडला नव्हता, शेती, जमिनीचं, घऱांचं नुकसान झालं आहे. आम्ही कॅबिनेट बैठकीत यासंदर्भात चर्चा केली आहे. यावेळेस नियम, अटी, शर्ती यावर बोट न ठेवता शेतकऱ्याच्या पदरात काय पडेल आणि त्याचे अश्रू कसे पुसले जातील यावर आमचं सरकार आम्ही गंभीर घेऊन. पुढील दोन तीन दिवसात निर्णय घेऊ आणि मदत करणार आहोत. मदतीसंदर्भात लावलेले अंदाज खोटे आहेत. आम्ही देणारे असून देत आलो आहोत. महायुती सरकार शेतकऱ्याला मोठा दिलासा देणार आहे. आम्ही मदत देताना हात आखडता घेणार नाही,” असंही एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. 

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Uniq Art Store India

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Uttarakhand News Doonited
Social media & sharing icons powered by UltimatelySocial
Instagram
WhatsApp