
शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी महाराष्ट्र पोलिसांवर गंभीर आरोप केले आहेत. महाराष्ट्र पोलिसांसारखे अकार्यक्षम डिपार्टमेंट जगात कुठेही नाही, असे वादग्रस्त विधान संजय गायकवाड यांनी केले आहे. तसेच पोलिसांनी जर 50 लाख पकडले तर ते 50 हजार दाख
.
संजय गायकवाड म्हणाले, सरकारने जर एखादा कायदा बनवला तर पोलिसांना एक हप्ता वाढून जातो. गुटखाबंदी केली की पोलिसांचा एक हप्ता वाढतो, दारूबंदी केली की पोलिसांचा एक हप्ता वाढतो, जर पोलिसांनी ठरवले की, एक वर्ष मी हरामीपणा करणार नाही, तर सगळे सुतासारखे सुरळीत होईल, असे गायकवाड म्हणाले.
बुलढाण्यातील दोन पोलिस हे चोरांचे सरदार
पुढे पत्रकारांशी बोलताना पत्रकारांनी संजय गायकवाड यांच्या मुलाला आलेल्या धमकीबद्दल विचारले. त्यावर बोलताना ते म्हणाले, माझ्या मुलापर्यंत पोहोचण्यासाठी त्यांना संजय गायकवाड नावाच्या पहाडाला पार करावे लागेल. पोलिस काहीही करू शकत नाहीत. माझ्या घरासमोर माझी गाडी जळाली कुठेही तपास झाला नाही. त्यामुळे पोलिस हे अकार्यक्षम असून बुलढाण्यातील दोन पोलिस हे चोरांचे सरदार असून चोरीचा माळ पोलिसांच्या घरात आढळतोच कसा? असा सवाल उपस्थित केला आहे.
एकदाच पाकिस्तानला चिरडून टाकले पाहिजे
पुढे बोलताना संजय गायकवाड म्हणाले, मागच्या वेळी आठ महिने सीमेवर फौजा उभ्या राहिल्या, मात्र काहीच झालं नाही. एकदाच पाकिस्तान चिरडून पीओके ताब्यात घ्या. या पाकिस्तानने आपले एवढे लोक मारले आणि आपण केवळ पाणी बंड करण्याचा निर्णय घेतो. एकदाच पाकिस्तानला चिरडून टाकले पाहिजे. ध्वजारोहण करण्याची हिंमत आपल्यामध्ये राहत नाही एवढ्या भितीचे वातावरण काश्मीरमध्ये आहे. देशातील मंदिरे सुरक्षित नाहीत, एकदाच पीओके ताब्यात घेऊन बॉर्डर करा. मागच्या वेळेस आठ आठ महीने सीमेवर फौजा उभ्या राहिल्या मात्र काहीच झाले नाही. निर्णय घ्यायचा असेल तर इस्राइलच्या पंतप्रधानांसारख घ्या, असा सल्लाही गायकवाड यांनी दिला आहे.
राज्यात उर्दू सुद्धा शिकवली पाहिजे – संजय गायकवाड
राज्यात शाळेत इयत्ता पहिलीपासून हिंदी भाषेची सक्ती करण्यात आल्यानंतर चांगलेच वादंग निर्माण झाले होते. मागील काही दिवसांपासून सुरू असलेला हा वाद तात्पुरता शांत झाल्यानंतर आता शिंदे गटाचे नेते आणि आमदार संजय गायकवाड यांनी राज्यात हिंदीसोबत उर्दू देखील शिकवली पाहिजे, असे वक्तव्य केले आहे. या वक्तव्यामागे त्यांनी अजब तर्क लावला आहे. आतंकवाद्यांचे मेसेज समजण्यासाठी हिंदीच काय तर राज्यात उर्दू सुद्धा शिकवल्या गेलीच पाहिजे, असे ते म्हणालेत. संजय गायकवाड यांच्या या वक्तव्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. हेही वाचा
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.