
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अनेकवेळा मुख्यमंत्री होण्याची इच्छा बोलून दाखवली आहे. मुख्यमंत्री होण्यासाठो योग जुळून यावा लागतो, कारण मलाही अनेक वर्षांपासून वाटते की मी मुख्यमंत्री व्हावे, पण कुठे जमतेय, असे विधान अजित पवार यांनी नुकतेच केले
.
शिवसेना ठाकरे गटाचे नेते विनायक राऊत यांनी अजित पवार यांना थेट मुख्यमंत्री पदाची ऑफर दिली आहे. रत्नागिरी येथे ते बोलत होते. विनायक राऊत म्हणाले, अजित पवार यांनी महाविकास आघाडीमध्ये यावे, त्यांचे मुख्यमंत्री होण्याचे स्वप्न पूर्ण होईल. तसेच एकनाथ शिंदे आणि भाजपमध्ये दूरी वाढत असून शिंदेंना नैराश्य आले आहे, असे म्हणत राऊत यांनी एकनाथ शिंदे यांना टोला लगावला आहे.
महाराष्ट्रात अनेक राजकीय बदल होताना दिसत आहेत. त्यात मनसे प्रमुख राज ठाकरे आणि शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे एकत्र येणार असल्याचे बोलले जात आहे. ठाकरे बंधू एकत्र यावेत ही महाराष्ट्राच्या जनतेची इच्छा आहे, असे विनायक राऊत म्हणाले आहेत. महाराष्ट्रासमोर आमचे वाद, भांडण क्षुल्लक गोष्टी असल्याचे राज ठाकरे यांनी म्हटले होते. त्यावर उद्धव ठाकरेंनी देखील सकारात्मक प्रतिसाद दिला होता.
पहलगाम हल्ल्यावर बोलताना विनायक राऊत यांनी मोदी सरकारवर टीका केली आहे. पहलगाम दहशतवादी अचानक आले नाहीत, पहलगाम पहलगाम हल्ला हा मोदी सरकारचं अपयश आहे, सध्या युद्धाचे वातावरण तयार केले जात असून, पक्षाची प्रसिद्धी केली जात आहे. अनेक लोकउपयोगी योजना बंद पडल्या आहेत, असा हल्लाबोल यावेळी राऊत यांनी केला आहे.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.