
परिचित तरुणांमध्ये आपसात सुरू असलेल्या वादात मध्यस्थीसाठी गेलेल्या एका २९ वर्षीय तरुणाचा खून झाला आहे. या वेळी तरुणाच्या मानेवर चाकूचा गंभीर घाव करून मुख्य आरोपीसह तिघे पसार झाले होते. ही घटना शुक्रवारी (दि. १३) मध्यरात्री साडेबारा वाजताच्या सुमारास
.
निखिल सुभाषराव थोरात (२९, रा. महात्मा फुले नगर नवसारी, अमरावती) असे मृत तरुणाचे नाव आहे. या प्रकरणात पोलिसांनी हिमांशू उर्फ दद्दू राजू छेत्री (२३, रा. उज्ज्वल कॉलनी, हर्षराज कॉलनी), यश ओमप्रकाश कनोजिया (२१, रा. हर्षराज कॉलनी) आणि जयेश ऊर्फ तात्या राजेंद्र गायकवाड (२०, रा. नवसारी गावठाण, अमरावती) या तिघांना {उर्वरित. पान ४
साडेचार सेमी रुंदीचा घाव; रक्ताचा सडा हिमांशूने निखिलच्या मानेवर केलेला घाव तब्बल ४.५ सेमी रुंद व खोल असल्याचे पोलिसांनी सांगितले. या घावामुळे निखिलच्या शरीरातून रक्ताचा सडा घटनास्थळी पडला होता. तसेच निखिलची जिन्स पॅण्ट व इतरही कपडे रक्ताने माखले होते.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.