digital products downloads

‘मुंबईतल्या लोढांसोबत दावोसमध्ये जाऊन करार का?’, विरोधकांच्या टीकेला मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं…

‘मुंबईतल्या लोढांसोबत दावोसमध्ये जाऊन करार का?’, विरोधकांच्या टीकेला मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं…

CM Devendra Fadanvis On Davos: दावोस येथे महाराष्ट्र सरकारने लोढा कंपनीसोबत एक महत्त्वाचा करार केला. यामुळे लोकांमध्ये प्रश्न निर्माण झाला की, महाराष्ट्रातीलच एका कंपनीसोबत परदेशात करार का? या चर्चेच्या केंद्रस्थानी अभिषेक लोढा होते, जे मंगलप्रभात लोढांचे पुत्र आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या कराराचे कारण स्पष्ट केले. या करारामुळे महाराष्ट्रात नवीन आर्थिक संधी निर्माण होणार आहेत, ज्यामुळे रोजगार आणि तंत्रज्ञान वाढणार आहे. काय म्हणाले फडणवीस? सविस्तर जाणून घेऊया.

Add Zee News as a Preferred Source

करार डेटा सेंटर आणि गुंतवणुकीसाठी

हा सामंजस्य करार (MoU) डेटा सेंटर पार्क उभारण्यासाठी आहे. यात हायपरस्केलर आणि AI डेटा सेंटरचा समावेश आहे. जगातील चार मोठ्या कंपन्या यात गुंतवणूक करत आहेत, ज्यामुळे मुंबईला डेटा सेंटर क्षेत्रात अग्रेसर स्थान मिळेल.
3.80 टक्के परदेशी गुंतवणूक (FDI) आणि फक्त 20 टक्के जमीन करारातील एकूण गुंतवणुकीपैकी तब्बल 80 टक्के रक्कम परदेशी थेट गुंतवणूक (FDI) स्वरूपात येणार आहे. उरलेली केवळ 2 टक्के रक्कम जमिनीच्या स्वरूपात भारतीय बाजूने असेल, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. 

परदेशी भांडवल स्वस्त आणि फायद्याचे

भारतीय कंपन्या आता जागतिक स्तरावर विस्तार करत आहेत. त्यांना तंत्रज्ञान आणि पैसा परदेशातून घ्यावा लागतो, कारण परदेशी भांडवल स्वस्त आणि मोठ्या प्रमाणात उपलब्ध असते. अशा करारांमुळे देश आणि राज्याला आर्थिक फायदा होत असल्याचे ते म्हणाले.

महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेला मोठी चालना

हा करार मुंबई महानगर प्रदेशात डेटा सेंटर इकोसिस्टम मजबूत करेल. यामुळे रोजगार निर्मिती, तंत्रज्ञान विकास आणि राज्याची आर्थिक प्रगती होईल.  अशा गुंतवणुकीमुळे महाराष्ट्र जगात आघाडीवर येईल, असा विश्वास यावेळी मुख्यमंत्री फडणवीसांनी व्यक्त केला. 

टीकाकारांना फडणवीसांचे प्रत्युत्तर

काही लोकांनी ‘टूलकिट’ चालवून यावर टीका केली, पण ज्यांना अर्थव्यवस्थेची समज नाही किंवा पैसे घेऊन टीका करणारे आहेत, त्यांच्याकडे दुर्लक्ष करा. राज्याने यापूर्वी 75 टक्के गुंतवणूक यशस्वी केली आहे, हीच खरी सत्यता असल्याचे प्रत्युत्तर मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले.

परदेशी गुंतवणुकीचा मोठा वाटा

एकूण करारांपैकी 83 टक्के थेट परदेशी गुंतवणुकीचे आहेत. 18 देशांमधून अमेरिका, जपान, सिंगापूर, जर्मनी, फ्रान्स, युएई इत्यादी देशातून ही गुंतवणूक येत आहे. उर्वरित 16 टक्के गुंतवणूक परदेशी तंत्रज्ञान भागीदारीतून आहे. एसबीजी, ब्रुकफिल्ड, आर्सेलर मित्तल, स्कोडा, फॉक्सवेगन, टाटा, अदानी, रिलायन्स, कोकाकोला अशा आंतरराष्ट्रीय कंपन्यांसोबत करार झाल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली. 

गुंतवणुकीचे क्षेत्र आणि वितरण

ही गुंतवणूक एआय, क्वांटम कम्प्युटिंग, डेटा सेंटर्स, ग्रीन स्टील, फिनटेक, लॉजिस्टिक्स अशा आधुनिक क्षेत्रांत येणार आहे. राज्याच्या सर्व भागांत गुंतवणूक वाटली जाणार आहे – एमएमआर आणि कोकणमध्ये 22 टक्के, विदर्भमध्ये 13 टक्के, तर उर्वरित 50 टक्के इतर भागांत. कोकणात 3.5 लाख कोटी, विदर्भात 2.7 लाख कोटी, छत्रपती संभाजीनगरमध्ये 55 हजार कोटी, उत्तर महाराष्ट्रात 50 
हजार कोटी इत्यादी प्रमुख गुंतवणूक असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Uttarakhand News Doonited
Social media & sharing icons powered by UltimatelySocial
Instagram
WhatsApp