digital products downloads

मुंबई पुण्यातील व्यावसायिक, गुंतवणूकदारांना झटका! महाराष्ट्रातील ‘या’ तालुक्याने घेतला मोठा निर्णय

मुंबई पुण्यातील व्यावसायिक, गुंतवणूकदारांना झटका! महाराष्ट्रातील ‘या’ तालुक्याने घेतला मोठा निर्णय

Prohibited To Sell Land To People Outside The Village : नवी मुंबई विमानतळामुळे रायगड जिल्ह्यात झपाट्याने विकास होत आहे. विविध प्रकल्पांसह गृहनिर्माण वसाहती स्थापन करण्यासाठी जमीनीची मागणी वाढली आहे. यामुळे अनेक व्यावसायिक आणि  गुंतवणूकदार येथे जमीनी खरेदी करत आहे. रायगडमधील एका गावाने ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. ग्रामस्थांच्या या निर्णयामुळे मुंबई पुण्यातील व्यावसायिक, गुंतवणूकदारांना झटका बसणार आहे. 

Add Zee News as a Preferred Source

रायगड जिल्ह्यात जमीन खरेदी विक्रीचे व्यवहार जोरात सुरू असतानाच म्हसळा तालुक्यातील ग्रामस्थानी एक अनोखा निर्णय घेतला आहे. ‘जमिनी वाचवा, गाव वाचवा’ हे अभियान त्यांनी हाती घेत ठाकरोली ग्रामस्थांनी एकमताने आपल्या जमिनी न विकण्याचा निर्णय घेतला आहे. गावक-यांनी मुख्य रस्त्यावर लावलेल्या फलकाने लक्ष वेधून घेतलं. गावाच्या प्रवेशद्वारावरच एक फलक लावण्यात आला आहे.  महत्वाचं म्हणजे गावातील तरुणाईने यात पुढाकार घेतला आहे. मागील काही वर्षांपासून मुंबई पुण्यातील व्यावसायिक , गुंतवणूकदार यांचं लक्ष रायगड जिल्ह्यातील जमिनींवर गेलं आहे. त्यांनी इथल्या जमिनी खरेदी करण्याचा सपाटा लावलाय. अशावेळी ठाकरोली ग्रामस्थानी घेतलेला निर्णय लक्ष्यवेधी ठरतोय. गावाबाहेरील फलकांची सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे.

यापूर्वी कोकणातील  चिपळूण तालुक्यातील मोरवणे ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेत गावकऱ्यांनी असाच एक महत्त्वपूर्ण आणि ऐतिहासिक ठराव एकमुखाने मंजूर केला होता. या ठरावानुसार गावातील जमीन गावाबाहेरील अथवा परजिल्ह्यातील व्यक्तींना विकता येणार नाही अशा स्वरूपाचा निर्णय घेण्यात आला आहे. एखाद्या कुटुंबाला खरी गरज भासल्यास ती जमीन फक्त गावातील नागरिकांनाच विकावी लागेल. ग्रामसभेतच अशा स्वरूपाचा ठराव अटींसह एकमताने मंजून करण्यात आला. 

FAQ

1 ठाकरोली गावाने कोणता निर्णय घेतला आहे?
उत्तर: ठाकरोली गावाने गावातील जमिनी गावाबाहेरील व्यक्तींना विकू नये असा निर्णय घेतला आहे.

2: हा निर्णय का घेण्यात आला आहे?
उत्तर: गावातील जमिनींचे व्यावसायिकीकरण टाळण्यासाठी आणि गावाची संस्कृती व परंपरा जपण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

 3: या निर्णयामुळे कोणावर परिणाम होणार आहे?
उत्तर: मुंबई-पुण्यातील व्यावसायिक आणि गुंतवणूकदारांना या निर्णयामुळे झटका बसणार आहे, कारण त्यांना येथील जमिनी खरेदी करणे शक्य होणार नाही.

 

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Uttarakhand News Doonited
Social media & sharing icons powered by UltimatelySocial
Instagram
WhatsApp