digital products downloads

मुंबई महापालिकेत युती हवीच: अन्यथा स्वबळावर महापौर करू, आमदार संजय गायकवाड स्पष्टच बोलले – Buldhana News

मुंबई महापालिकेत युती हवीच:  अन्यथा स्वबळावर महापौर करू, आमदार संजय गायकवाड स्पष्टच बोलले – Buldhana News


मुंबई महापालिका निवडणुकीत शिवसेना शिंदे गट आणि भाजप यांची महायुती गरजेची आहे, कारण जर युती झाली नाही तर त्याचा फटका महायुतीच्या जागांना बसेल आणि त्याचा फायदा महाविकास आघाडीला होईल, असे मत शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी व्यक्त केले. पालि

.

भाजप नेते व मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी केलेल्या वक्तव्याचा देखील संजय गायकवाड यांनी समाचार घेतला. आमच्या पक्षाचा अजेंडा वेगळा आहे. आम्ही जी क्रांती केली त्यामुळे भाजप आणि महायुती सरकारमध्ये आहे. त्यामुळे मंगलप्रभात लोढा यांचे ते वैयक्तिक मत असू शकते. परंतु, आमचा पक्ष उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सल्ल्याने चालतो, असे गायकवाड यांनी स्पष्ट केले आहे. आता संजय गायकवाड यांच्या वक्तव्यावर लोढा काय प्रतिक्रिया देतात याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.

वृक्षांशी अनेकांची आस्था जोडलेली आहे- संजय गायकवाड

दरम्यान, सध्या नाशिक येथील तपोवन परिसरातील वृक्ष तोडीला सर्वच स्तरातून विरोध होताना दिसत आहे. यावर देखील संजय गायकवाड यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, कुंभमेळ्यासाठी एवढी मोठी झाडं तोडणे, त्या वृक्षांशी अनेकांची आस्था जोडलेली आहे. भावना जोडलेली आहे. आस्थेचा आणि भावनेचा विचार केला गेला पाहिजे. विकास करत असताना जंगलाचा ऱ्हास करतो, पर्यावरणाला धोका निर्माण झाला आहे. ग्लोबल वॉर्मिग प्रॉब्लेम उभा राहिला आहे. त्यामुळे शिवसेना जनतेच्या सोबत उभी आहे, असेही संजय गायकवाड म्हणाले.

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Uttarakhand News Doonited
Social media & sharing icons powered by UltimatelySocial
Instagram
WhatsApp