
Navi Mumbai Airport: महाराष्ट्रासह संपूर्ण देशवासीयांना नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन कधी होणार याची प्रतीक्षा आहे. आता विमानतळाच्या उद्घाटनासंदर्भात नवी तारीख समोर आली आहे. सप्टेंबर महिन्याअखेरीस विमानतळाचे उद्घाटन करण्याचे यंत्रणांचे नियोजन आहे. नवी मुंबईतील विमानतळामुळे मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमातळावरील ताण कमी होणार असून, मुंबईसह नवी मुंबई, पुणे, नाशिक आणि कोकणातील प्रवाशांना थेट दिलासा मिळणार आहे.
नवी मुंबईच्या पनवेलजवळील उलवे नोडमध्ये 1,160 हेक्टरवर उभारलेल्या या विमानतळाची वार्षिक क्षमता तब्बल 9 कोटी प्रवाशांची आहे. या विमानतळाला अत्याधुनिक पायाभूत सुविधांसह सक्षम दळवळण यंत्रणा उपलब्ध केल्या आहेत. मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे, गोवा हायवे आणि जेएनपीटी पोर्टच्या अगदी जवळ असल्याने नागरिकांचा प्रवास सोपा होणार आहे.
याशिवाय नवी मुंबई विमानतळाला जोडणाऱ्या मुंबई ट्रान्स हार्बर लिंक-अटल सेतू हा पूल खरा गेमचेंजर ठरणार आहे. तसंच, नवी मुंबई विमानतळापर्यंत पोहोचण्यासाठी प्रशासनाकडून वाहतुकीचे इतर पर्यायही उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. प्रशासन वॉटर टॅक्सीचा पर्यायही चाचपडत आहेत.
सरकारकडून या प्रकल्पाला वाहतुकीचे आधुनिक केंद्र बनवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. बेलापूर-पेन्थर मेट्रो लाईन उलवेपर्यंत वाढवली जाणार आहे. पनवेल स्थानकाला रिजनल हब म्हणून विकसित करण्याची योजना आहे. पुणे व कोकणातील प्रवाशांसाठी थेट शटल सेवा उपलब्ध होणार आहे.
मुंबई, ठाण्याहून खास बस
एमएसआरटीसीकडून ठाणे, वाशी, दादर, पनवेलहून एअरपोर्ट एक्सप्रेस बस सुरू करण्याचे नियोजन आहे. इलेक्ट्रिक बसला यामध्ये विशेष प्राधान्य दिले जाणार आहे.
नवी मुंबई विमानतळावर पोहोचण्यासाठी अंडरग्राउंट मेट्रोला देखील मंजुरी मिळाली आहे. नवी मुंबई विमानतळावर येण्यासाठी चारही दिशांनी सुविधा उपलब्ध असणार आहेत. मेट्रो, रेल्वे, वॉटर, ट्रान्सपोर्ट अशी मोठी कनेक्टिव्हीटी केली जाणार आहे. प्रवाशांसाठी महत्त्वाचं एअरपोर्ट असेल. अंडर ग्राउंड मेट्रो असेल कोणालाही पायी चालायला लागणार नाही. अंडरग्राउंड मेट्रो सर्व एअरपोर्टला कनेक्ट असतील.
FAQ
1. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन कधी होणार?
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे (NMIA) उद्घाटन सप्टेंबर ३०, २०२५ रोजी होण्याची शक्यता आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत हे उद्घाटन होईल असे अपेक्षित आहे. पूर्वी एप्रिल, जून आणि ऑगस्ट २०२५ च्या तारखा होत्या, पण आता रनवे बंदी २० सप्टेंबरला संपेल आणि ऑक्टोबरपासून घरगुती उड्डाणे सुरू होऊ शकतात.
2. हा विमानतळ कुठे आणि किती मोठा आहे?
हा विमानतळ पनवेलजवळील उलवे नोडमध्ये १,१६० हेक्टर जमिनीवर बांधला जात आहे. सुरुवातीला २० दशलक्ष प्रवाशांची क्षमता असेल, जी नंतर ९ कोटीपर्यंत वाढेल. दोन समांतर रनवे असतील, जे A380 सारख्या मोठ्या विमानांना हाताळू शकतील.
3. या विमानतळामुळे कोणता फायदा होणार?
मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरील ताण कमी होईल. मुंबई, नवी मुंबई, पुणे, नाशिक आणि कोकणातील प्रवाशांना सोयीचा पर्याय मिळेल. वार्षिक ८ लाख टन कॅरगो हाताळण्याची क्षमता असेल, ज्यामुळे अर्थव्यवस्थेला चालना मिळेल.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.