digital products downloads

म्होरक्या जिद्दी व धाडसी असेल तर…: जनावरे सुद्धा विश्वास ठेवतात, म्होरक्या कोण? भास्कर जाधवांच्या व्हॉट्सअॅप स्टेटसने चर्चांना उधाण – Mumbai News

म्होरक्या जिद्दी व धाडसी असेल तर…:  जनावरे सुद्धा विश्वास ठेवतात, म्होरक्या कोण? भास्कर जाधवांच्या व्हॉट्सअॅप स्टेटसने चर्चांना उधाण – Mumbai News


शिवसेना ठाकरे गटाचे नेते पक्षात नाराज असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहेत. याबाबत त्यांनी शनिवारी बोलून देखील दाखवले होते. परंतु, त्यांनी रविवारी सकाळी पत्रकार परिषद घेत अडचणीच्या काळात आपल्या हातून चांगले काहीतरी घडावे यासाठी माझी तळमळ असल्या

.

व्हॉट्सअॅप स्टेटसची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा म्होरक्या जिद्दी आणि धाडसी असेल तर माणसेच काय जनावरे पण विश्वास टाकतात. या व्हिडिओतून संघटना काय आहे आणि संघटना कशी घडवता येते याचा बोध घेण्यासारखा आहे, असे भास्कर जाधव म्हणत आहेत. संघटनेचा म्होरक्या असा उल्लेख केल्याने भास्कर जाधव यांचा रोख नेमका कुणाकडे आहे? एकनाथ शिंदेंकडे की उद्धव ठाकरेंकडे? हा प्रश्न सर्वांनाच पडला आहे. स्टेटसमधील व्हिडिओत एक मेंढ्यांचा कळप पाण्यातून जात असल्याचे दिसत आहे, आपल्या समोरील व्यक्तीवर विश्वास ठेऊन हा कळप पुढे जात असल्याचे दिसून येत आहे. भास्कर जाधव यांनी व्हॉट्सॲपला ठेवलेल्या स्टेटसची सध्या कोकणातील राजकारणात आणि राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगली आहे.

भास्कर जाधव नेमके काय म्हणाले? दरम्यान, कुठलेही पद मिळवण्यासाठी मी कधी काम केले नाही. गेले 43 वर्ष मी राजकारणात आहे, मी एवढी पदे उपभोगली आहेत, मी त्याकाळी कधी अशी स्टंटबाजी केली नाही, आता का करेल? बाळासाहेब ठाकरेंचे खरे वारसदार हे उद्धव ठाकरेच आहेत. मी जे बोललो ते बाजूला ठेवले गेले आणि जे नाही बोललो त्याला प्रसिद्ध करण्यात आले. मी कधी खोटे बोलत नाही. 43 वर्षांची माझी राजकीय कारकिर्द झाली आहे. कारकिर्दीच्या उत्तरार्धाला लागलेला मी कार्यकर्ता आहे. अडचणीच्या काळात आपल्या हातून चांगले काहीतरी घडावे यासाठी माझी तळमळ आहे, असे भास्कर जाधव म्हणाले.

मोरक्या हा उद्धव ठाकरे – नीतेश राणे भास्कर जाधव यांच्या स्टेट्ससंदर्भात बोलताना भाजप आमदार आणि मंत्री नीतेश राणे यांनी उद्धव ठाकरेंवर सडकून टीका केली आहे. मोरक्या हा उद्धव ठाकरे असून उद्धव ठाकरे यांची लायकी त्यांच्या सहकाऱ्यांना आता कळत आहे. त्या माणसाला स्वतःच्या भावाला, घर सांभाळता येत नाही, तो पक्ष काय सांभाळणार. उद्धव ठाकरे यांच्या अडीच वर्षाच्या कालावधीत महाराष्ट्राची जेवढी अधोगती झाली, तेवढी केव्हाही झाली नव्हती. त्यामुळे त्यांच्या पक्षातील लोक मार्ग काढत वेगवेगळ्या पक्षात जात आहेत. स्वतःचे भविष्य घडवू शकला नाही, तो दुसऱ्याचे भविष्य काय घडवणार, असे नीतेश राणे म्हणाले.

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Uniq Art Store India

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Uttarakhand News Doonited
Social media & sharing icons powered by UltimatelySocial
Instagram
WhatsApp