
प्रणव पोळेकर, (प्रतिनिधी) रत्नागिरी : रत्नागिरीतली चर्चेत असलेली नगरपरिषद म्हणजे राजापूर नगरपरिषद आहे. नऊ वर्ष निवडणूक झाली नाही त्यामुळे राजापूरचा विकास करायचा, असं आश्वासन महाविकास आघाडी देत आहे तर घराणेशाही मोडीत काढायची आहे, असं आवाहन महायुती करत आहे.
नगरपरिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. प्रचाराचा वेगही वाढलाय. रत्नागिरीतील राजापूर नगरपरिषद सध्या चर्चेत आहे. त्याच कारण आहे इथं माजी आमदार आणि माजी नगराध्यक्ष राहिलेल्या काँग्रेसच्या हुस्नबानू खलिफे पुन्हा एकदा महाविकास आघाडीकडून निवडणुकीच्या मैदानात उतरल्यात. 15 वर्षांनंतर जरी त्या या रणसंग्रमात उतरल्या असल्या तरी प्रशासकीय आणि सामाजिक प्रश्नांची त्यांना उत्तम जाण आहे. या जोरावर आपण जिंकून येऊ, असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय.
महाविकास आघाडीचा उमेदवार तगडा असला तरी आव्हान देण्यासाठी महायुतीनं श्रुती ताम्हणकरांना रिंगणात उतरवलंय. शिंदेंच्या शिवसेनेनं त्यांना उमेदवारी दिलीय. राजापुरातली घराणेशाही आपल्याला मोडून काढायचीय आणि विकासाचं राजकारण करायचंय, त्यामुळे राजापूरचा विकास हेच आमचं व्हिजन आहे, असं महायुतीच्या उमेदवार श्रुती ताम्हणकर यांनी म्हटलंय.
हेही वाचा : गडचिरोली नगरपरिषदेवर कुणाची सत्ता? बड्या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला
आपलं काम जनतेला आजही स्मरणात आहे, असं म्हणणा-या हुस्नबानो यांच्यावर मतदार पुन्हा विश्वास टाकतात की राजापुरच्या विकासाचं व्हिजन मतदारांना भावतं, हे 3 तारखेला समोर येईल.
FAQ :
राजापूर नगरपरिषद निवडणूक कधी आहे?
राजापूर नगरपरिषद निवडणूक 3 तारखेला होणार आहे.
राजापूर नगरपरिषद निवडणुकीत कोणते पक्ष भाग घेत आहेत?
राजापूर नगरपरिषद निवडणुकीत महाविकास आघाडी आणि महायुती भाग घेत आहेत.
राजापूर नगरपरिषद निवडणुकीत कोणत्या उमेदवारांना पाठींबा दिला आहे?
महाविकास आघाडीने हुस्नबानू खलिफे यांना पाठींबा दिला आहे, तर महायुतीने श्रुती ताम्हणकर यांना पाठींबा दिला आहे.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.



