digital products downloads

राजकारणात खुर्ची माणसापेक्षा महत्त्वाची: शासकीय दुखवटा संपण्यापूर्वी हे निर्णय व्हायला नको होते, मनाला न पटणारी गोष्ट- संजय शिरसाट – Chhatrapati Sambhajinagar News

राजकारणात खुर्ची माणसापेक्षा महत्त्वाची:  शासकीय दुखवटा संपण्यापूर्वी हे निर्णय व्हायला नको होते, मनाला न पटणारी गोष्ट- संजय शिरसाट – Chhatrapati Sambhajinagar News



राजकारणात गेल्या दोन दिवसांमध्ये ज्या घडामोडी पाहिल्या यामुळे असे वाटते की माणसांपेक्षा खुर्चीला जास्त महत्त्व आहे. राजकारणामध्ये खुर्ची जिंकलेली आहे, सार्वजनिक जीवनातही खुर्चीच जिंकली आणि माणूस हरल्याचे चित्र दिसून येत आहे. सर्व सामान्य माणसांना या गोष्टी भावत नाहीत, शासकीय दुखवटा संपण्यापूर्वी हे सर्व निर्णय व्हायला नको होत असे मला वाटते, असे शिवसेनेचे मंत्री संजय शिरसाट यांनी म्हटले आहे. संजय शिरसाट म्हणाले की, शरद पवारांनी जे सूचक वक्तव्य केले आहे त्याकडे जर पाहिले तर राजकारणातील घडामोडीमध्ये शरद पवारांना विचारले गेले नसावे. पक्षातील नेत्यांनी आणि राजकीय सल्लागारांनी घेतलेला हा निर्णय शरद पवारांना याबद्दल कितपत माहिती आहे हे सांगणे शक्य नाही. देवेंद्र फडणवीस यांनी जी उपमुख्यमंत्रीपदाबाबत जी भूमिका घेतलेली आहे तीच भूमिका आमची आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमदारांनी निर्णय घ्यायचा आहे. त्यांनी घेतलेल्या निर्णयाना पाठिंबा देणं हे आम्हाला गरजेचे आहे. त्यांनी घेतलेल्या निर्णयाला आम्ही विरोध करणार नाही. म्हणून पवारांनी शंका व्यक्त केली असेल संजय शिरसाट म्हणाले की, अजित पवार हे राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा होते त्यांच्या शब्दाच्या आणि निर्णयाविरोधात जाण्याची कोणत्याही नेत्याची ताकद नव्हती. त्यांची शरद पवार किंवा इतर नेत्यांशी जी बैठक झाली आहे असे जे म्हणतात त्यात जो निर्णय झाला असता तो सर्वांनी मान्य केला असता. पण आता मला वाटते परिस्थिती आता बदललेली आहे. आता सामूहिक निर्णयाचे एक सामूहिक वारे राजकारणामध्ये सुरू झाले आहे म्हणून शरद पवारांनी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्रीकरणाच्या चर्चेमध्ये खंड पडेल अशी शंका व्यक्त केली आहे. फडणवीस अन् आमची भूमिका एकच संजय शिरसाट म्हणाले की, दोन्ही राष्ट्रवादीचे एकत्रीकरण ही त्यांची पहिला भूमिका होती. यावर त्यांच्या पक्षाची चर्चा झाली, ते एकत्र आले असते तर ते केंद्रात एनडीए आणि राज्यात ते महायुतीमध्ये आले असते आणि त्याच पद्धतीचे राजकारण पुढे चालले असते. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे जे नेते आहेत ते सुनेत्रा पवारांनाच पुढे करतील.

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Uttarakhand News Doonited
Social media & sharing icons powered by UltimatelySocial
Instagram
WhatsApp