
सामाजिक सौहार्द जपणाऱ्या नागपूर शहरात हिंसक घटना घडावी हे महाराष्ट्राला शोभणारे नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे नागपूरचे प्रतिनिधी आहेत पण शांतताप्रिय शहरात दंगल भडकली जाते व त्याची कल्पना सरकारला नाही हे आश्चर्याचे
.
नागपूरमधील परिस्थितीसाठी मुख्यमंत्री जबाबदार
यासंदर्भात प्रतिक्रिया देताना खासदार वर्षा गायकवाड म्हणाल्या की, नागपूरची घटना अत्यंत दुर्दैवी आणि निषेधार्ह आहे. नागपूर नेहमीच शांतता आणि सामाजिक ऐक्यासाठी ओळखले जाते, देशभरात दंगली होत असताना देखील नागपूरने कधीही अशा प्रकारच्या हिंसाचाराला थारा दिला नव्हता पण दुर्दैवाने मागील काही दिवसांपासून फडणवीस सरकारमधील काही मंत्री जाणीवपूर्वक भडकाऊ वक्तव्ये करत आहेत, समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. आज त्याचे परिणाम नागपूरच्या रस्त्यांवर दिसत आहेत. या परिस्थितीसाठी मुख्यमंत्री जबाबदार आहेत, गृहमंत्री म्हणून ते आपली जबाबदारी चोख पार पाडू शकले नाहीत. समाजात तेढ निर्माण करणाऱ्या आणि बेताल वक्तव्य करणाऱ्या मंत्र्याला मंत्रिमंडळातून तात्काळ हटवावे.
अशा प्रकारचा हिंसाचार चिंतेची बाब
महाराष्ट्राला थोर साधू संत, महापुरुषांचा वारसा लाभलेला आहे, छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज, महात्मा जोतिबा फुले, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुरोगामी विचाराच्या महाराष्ट्रात अशा प्रकारचा हिंसाचार व्हावा ही चिंतेची बाब आहे. महाराष्ट्रात सर्व जाती धर्माचे लोक गुण्यागोविंदाने नांदत आहेत. धर्म आपल्या जागेवर व राजकारण आपल्या जागी आहे परंतु काही लोक धर्माच्या आधारावर राजकारण करून स्वतःचा स्वार्थ साधण्याचा प्रयत्न करत आहे हे दुर्दैवी आहे. नागपूरच्या नागरिकांनी कृपया अफवांवर विश्वास ठेवू नये, शांतता राखावी, कोणत्याही षडयंत्राला बळी पडू नये, असे आवाहनही खासदार वर्षा गायकवाड यांनी केले आहे.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.