
वाळवा तालुक्यातील तांदुळवाडी गावातील जल जीवन मिशनसाठी काम करणाऱ्या 35 वर्षीय ठेकेदार हर्षल पाटील यांनी बिले वेळेवर न मिळाल्यामुळे आत्महत्या केल्याचा हृदयद्रावक प्रकार उघडकीस आला आहे. त्यांच्या पश्चात पत्नी व पाच वर्षांची मुलगी असा परिवार असून, या घटन
.
या प्रकरणावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि माजी खासदार राजू शेट्टी यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे. त्यांनी स्पष्ट शब्दांत म्हटले आहे की, सामान्य जनतेचा बळी घेऊन तुम्ही जो बेधुंद कारभार चालवला आहे, तो आता शेतकऱ्यांच्या आत्महत्यांपासून ठेकेदारांच्या आत्महत्यांपर्यंत पोहोचला आहे. ही तुमच्या कर्माची फळं सामान्य जनता भोगत आहे असे म्हणत त्यांनी फडणवीस सरकारवर टीकास्त्र डागले आहे.
कामं करूनही बिले नाही
राजू शेट्टी पुढे म्हणाले की, गेल्या दीड-दोन वर्षांपासून ठेकेदारांनी कामे करूनही त्यांना बिले मिळत नाहीत. त्यामुळे त्यांची आर्थिक स्थिती दयनीय झाली आहे. अनेक कुटुंबं उध्वस्त झाली आहेत. हर्षल पाटील हे त्याचे ताजं उदाहरण आहे. एका चुणचुणीत बापाचं लेकरू, एका पत्नीच्या कपाळचं कुंकू, एका पित्याचं आधारवड… तुमच्या धोरणांमुळेच हे सर्व उद्ध्वस्त झाले आहे.
शक्तिपीठसाठी 20 हजार कोटींचे कर्ज
राजू शेट्टी पुढे म्हणाले की, शक्तिपीठ महा मार्गासाठी 20 हजार कोटींचे कर्ज घेऊन 86 हजार कोटींचा रस्ता बांधण्याचे खूळ तुमचे सरकार करत आहे, पण ज्या ठेकेदारांनी प्रत्यक्ष काम केले त्यांना पिळवटून टाकत आहे, अशी संतप्त प्रतिक्रिया शेट्टींनी दिली आहे.
सरकारने थकीत बिले तत्काळ द्यावीत
राजू शेट्टी पुढे म्हणाले की, हर्षल पाटील यांची आत्महत्या ही केवळ एक घटना नसून, संपूर्ण राज्यातील सरकारी ठेकेदारांची परिस्थिती किती बिकट झाली आहे, याचे द्योतक असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. राज्य सरकारने कंत्राटदारांचे थकीत बिले तत्काळ द्यावीत आणि नव्याने अशी दुःखद प्रकरणं होऊ नयेत, अशी मागणी त्यांनी केली.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.