
Maharashtra Weather News: नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीलाच राज्यात थंडीची लाट जाणवू लागली होती. मात्र त्यानंतर थंडी हळूहळू ओसरु लागली आहे. कमाल तापमानातदेखील वाढ होत आहे. त्यामुळं राज्यात थंडी ओसरली का? असा सवाल नागरिकांना पडला आहे. राज्यात उन्हाचा चटका आणि उकाडा तापदायक ठरत आहे.
राज्यातील बहुतांश जिल्ह्यात तापमानाचा पारा 15 अंशाच्या वर गेला आहे. त्यामुळं हुडहुडी गायब झाली आहे. दुपारच्या वेळेस तापमानाचा पारा वाढल्याने उन्हाचा चटका सहन करावा लागत आहे. तसंच, वाढलेला उकाडा हा रात्री उशिरापर्यंत कायम राहत आहे.
श्रीलंका आणि बंगालच्या उपसागरात तीव्र कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय असून ही प्रणाली उद्यापर्यंत तामिळनाडू आणि पदुच्चेरीकडे येण्याची शक्यता आहे. तसंच, बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या सेनयार चक्रीवादळ निर्माण झाले आहे. सध्या उत्तरेकडून येणारे थंड वाऱ्यांचे प्रवाह कमी झाले आहेत. त्यामुळं मागील आठवड्यातील तापमान 23 अंशावर गेले होते. आताही उकाड्यात वाढ झाली असून कमाल तापमान 35 अंशापर्यंत गेले आहे.
राज्यातील ढगाळ हवामान हळूहळू निवळत असल्याचे समोर येत आहे. आज किमान तापमानात दोन ते तीन अंशांची घट होण्याची शक्यता आहे. तर, उर्वरित राज्यात तापमानातील वाढ कायम असून उकाडा कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
FAQ
1) राज्यात थंडी ओसरली आहे का?
होय, नोव्हेंबरच्या सुरुवातीला जाणवलेली थंडी हळूहळू ओसरली आहे. कमाल तापमानात वाढ झाली असून बहुतांश जिल्ह्यांमध्ये पारा १५ अंशांच्या वर गेला आहे.
2) दिवसा आणि रात्री हवामान कसे आहे?
दुपारच्या वेळेस तापमानाचा पारा वाढल्याने उन्हाचा चटका सहन करावा लागत आहे. तसेच, वाढलेला उकाडा रात्री उशिरापर्यंत कायम राहत आहे.
3) बंगालच्या उपसागरात कोणती हवामान प्रणाली सक्रिय आहे?
श्रीलंका आणि बंगालच्या उपसागरात तीव्र कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय आहे. तसेच, बंगालच्या उपसागरात ‘सेनयार’ नावाचे चक्रीवादळ निर्माण झाले आहे.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.



