
राज्यात शासकिय कार्यालयांमधून अनुसुचीत जमातीच्या 85 हजार रिक्तजागा तातडीने भरण्यात याव्यात यासह इतर मागण्यांबाबत शासन दरबारी हालचाली सुरू असून लवकरच या संदर्भात जाहिरात प्रसिद्ध होईल असे आश्वासन दिल्यानंतर आदिवासी बांधवांनी मागील 31 दिवसांपासून सुरू
.
राज्यात अनुसुचीत जमातीचे जात प्रमाणपत्र अवैध ठरवल्यामुळे रिक्त झालेल्या पदांवर संबंधित विभागाने काल बध्द कार्यक्रम राबवून विशेष पदभरती मोहिम घ्यावी, राज्यातील विविध शासकिय कार्यालयात रिक्त असलेल्या अनुसुचीत जमाती संवर्गातील 85 हजार पदे तातडीने भरावीत, शासकिय व निमशासकीय पद भरतीमध्ये अनुसुचीत जमातीसाठी जातवैधता प्रमाणपत्र बंधनकारक करावे, जात पडताळणी समित्यांकडे प्रलंबित असलेल्या सशर्त वैधता प्रकरणांची चौकशी करून तातडीने कारवाई करावी यासह इतर मागण्यांसाठी आदिवासी युवक कल्याण संघाच्या वतीने ता. 16 जुलैपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर साखळी उपोषण सुरु करण्यात आले आहे.
या उपोषणाला राजकिय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी भेट देऊन प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले. या शिवाय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हिंगोली दौऱ्यात त्यांच्याकडे मागण्यांचे निवेदन सादर केले. त्यांनी मंत्रीमंडळ बैठकीत याबाबत सकारात्मक चर्चा करण्याचे आश्वासन भाषणातून दिले होते.
त्यानंतर या आंदोलनाकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आदिवासी बांधवांनी ता 9 ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. यावेळी माजी मंत्री शिवाजीराव मोघे, माजी आमदार डॉ. संतोष टारफे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष गणाजी बेले, संजय भुरके, आदिवासी युवक कल्याण संघाचे अध्यक्ष डॉ. सतीष पाचपुते, माजी जिल्हा परिषद सदस्या वंदना टारफे यांच्यासह हजारो आदिवासी बांधव सहभागी झाले होते. या मोर्चानंतर पुढील आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशाराही देण्यात आला होता.
याशिवाय दुसरीकडे ता. 16 जुलैपासून सुरू असलेले साखळी उपोषण कायम होते. त्यानंतर आज पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आंदोलनकर्त्यांची भेट घेतली. यावेळी आमदार तानाजी मुटकुळे, आमदार संतोष बांगर, आमदार राजेश नवघरे, जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांची उपस्थिती होती. यावेळी माजी आमदार डॉक्टर संतोष टारफे, माजी जिल्हा परिषद सदस्य डॉक्टर सतीश पाचपुते यांच्यासह आंदोलन विद्यार्थ्यांची उपस्थिती होती.यावेळी पालकमंत्री झिरवाळ यांनी आंदोलन कर्त्यांच्या मागण्या समजून घेतल्या. यावेळी माजी आमदार डॉक्टर टारफे व माजी जिल्हा परिषद सदस्य डॉक्टर पाचपुते यांनी सर्व परिस्थिती समजावून सांगितली.
यावेळी पालकमंत्री झिरवाळ यांनी आदिवासी बांधवांचे प्रश्नावर शासन दरबारी पाठपुरावा सुरू असून लवकरच हा प्रश्न निकाली काढणार असल्याचे आश्वासन दिले. पद भरती संदर्भात शासकीय पातळीवरून हालचाली सुरू असून लवकरच या संदर्भात जाहिरात प्रसिद्ध होणार असल्याचे त्यांनी सांगितले. पालकमंत्री झिरवाळ यांच्या आश्वासनानंतर मागील 31 दिवसापासून सुरू असलेले उपोषण आज मागे घेण्यात आले.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.