
Maharashtra Weather Today: गेल्या काही दिवसांपासून हवामानात सातत्याने बदल होताना दिसत आहेत. राज्यातील बहुतांश भागात अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा पाऊस झाला. अवकाळी पावसामुळं अनेक शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहेत. पाऊस पडून गेल्यानंतर वातावरण दमट व उष्ण राहणार असा इशारा हवामान विभागाने दिला होता. मात्र तापमानात आता आणखी वाढ होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. पुढील 48 तासांत उत्तर महाराष्ट्रातील काही भागांत कमाल तापमान 40 अंशापेक्षा जास्त नोंदवले जाऊ शकते.
पुढील ४८ तासांत उत्तर महाराष्ट्रातील काही भाग कमाल तापमान ४०+ पर्यंत पोहोचू शकतात. वायव्य भागातील अतिरेकी तापमानावर लक्ष ठेवा आणि काळजी घ्या. नंदुरबार, जळगाव, पुणे, धुळे नाशिक आणि आसपासच्या लोकांनी कृपया लक्ष ठेवा, असं होसाळीकर यांनी म्हटलं आहे. दरम्यान, मुंबईचा पारा ३५ वर असला तरी हवामान उष्ण आणि दमटच राहील, असाही अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
मध्य प्रदेश आणि परिसरावरील चक्राकार वारे वाहत असून उत्तर महाराष्ट्रापासून उत्तर तामिळनाडूपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रीय आहे. अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरावरील बाष्पयुक्त वाऱ्यांचा संगम होत असल्याने राज्यात ढगाळ वातावरणदेखील कायम असणार आहे.
शनिवारी राज्यात तापमानाचा पारा कसा होता?
मुंबई ३५.९, अहिल्यानगर 37.9, नाशिक 39.1, सोलापूर 39.6, परभणी 37.8, जळगाव 40.5, ठाणे 38, छ. संभाजीनगर 39.4, मालेगाव 40.6 तर विदर्भात अकोला 41.7, अमरावती 41.2, भंडारा 39.6, बुलढाणा 37.2, चंद्रपूर 41.8, गडचिरोली 39, गोंदिया 38.8, नागपूर 40.2 आणि वर्धा येथे 39.1 अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली आहे.
यंदाच्या उन्हाळी हंगामात (एप्रिल ते जून) देशाच्या बहुतांश भागात कमाल तापमान सरासरीपेक्षा अधिक राहण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. महाराष्ट्राच्या बहुतांश भागात उन्हाचा चटका तापदायक ठरणार असून, राज्यात तीव्र उष्ण लाटा येण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. एप्रिल महिन्यात महाराष्ट्र अधिक तापण्याची शक्यता असल्याचे हवामान विभागाकडून सांगण्यात आले.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.