
सार्वजनिक सुरक्षेच्या दृष्टीने तसेच कायदा व सुव्यवस्थेच्या अंमलबजावणीत पोलिस विभागाला अधिक प्रभावी सहाय्य मिळावे, यासाठी राज्यात अद्यावत सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे व देखभाल करणे बाबत सुसूत्रता आणण्यासाठी आज सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे गृह राज्यमंत्री
.
राज्यातील विविध विभागांच्या माध्यमातून सीसीटीव्ही कॅमेरे बसवले जात असले तरी, या प्रक्रियेत गृह विभागाच्या आवश्यक अटी व गरजा विचारात घेतल्या जात नव्हत्या. त्यामुळे भविष्यात, गृह विभागाव्यतिरिक्त ज्या विभागांमार्फत सीसीटीव्ही कॅमेरे बसवले जातील, त्यांनी गृह विभागाच्या निकषांचा समावेश करणे बंधनकारक राहील.
सीसीटीव्ही ही कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने एक प्रभावी आणि सबळ यंत्रणा असून, गुन्हे उघडकीस आणण्यासाठी हे महत्त्वाचे साधन आहे. त्यामुळे या यंत्रणेच्या कार्यक्षमतेत अधिक सुधारणा होण्यासाठी आणि देखभाल, दुरुस्ती प्रक्रियेत एकसंधता यावी यासाठी धोरणात्मक बदल करणे आवश्यक आहे.
या पार्श्वभूमीवर मा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मान्यतेनुसार उच्चस्तरीय समिती गठित करण्याचा निर्णय लवकरच घेतला जाणार आहे. या बैठकीस आमदार सिद्धार्थ शिरोळे, गृह विभागाचे प्रधान सचिव (विशेष – कायदा व सुव्यवस्था) अनुप कुमार सिंह, माहिती व तंत्रज्ञान विभागाचे संचालक अनिल भंडारी, सहायक पोलीस महानिरीक्षक (नियोजन व समन्वय) प्रकाश जाधव, पोलीस उपायुक्त अकबर पठाण तसेच गृह विभाग, नगर विकास विभाग आणि महानगरपालिकेचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.