
राज ठाकरे यांनी केलेल्या मतचोरीच्या आरोपांवरून आशिष शेलार यांनी टीका केली आहे. माहीम मतदारसंघात अमित ठाकरे यांची मते महेश सावंत यांनी चोरली का? याचे उत्तर राज ठाकरेंनी द्यावे, असे आशिष शेलार म्हणालेत. तसेच त्यांनी उद्धव ठाकरेंवर टीका करताना बेस्ट पतप
.
भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी सोमवारी मुंबई भाजपच्या अध्यक्षपदी आमदार अमित साटम यांची निवड केली. यानंतर आशिष शेलार यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यावर मतचोरीच्या आरोपावरुन आणि बेस्ट पतपेढीच्या निकालावरून जोरदार टीका केली.
नेमके काय म्हणाले आशिष शेलार?
शेलार यांनी उपरोधिकपणे म्हटले की, मी ठाकरे बंधूंना बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीच्या निकालाची फ्रेम करुन पाठवणार आहे. त्या फ्रेममध्ये फक्त भोपळा असेल.
राज ठाकरे यांनी नुकताच पुण्यात झालेल्या मनसेच्या मेळाव्यात विधानसभा निवडणुकीत मतांची चोरी झाल्याचा आरोप केला होता. यावर पलटवार करताना शेलार यांनी राज ठाकरेंना थेट आव्हान दिले. जर मतचोरी झाली असेल तर विधानसभा निवडणुकीत माहिम मतदारसंघात अमित ठाकरे यांची मते महेश सावंत यांनी चोरली आहेत का? तसेच, मनसेचे मुंबई विभाग अध्यक्ष संदीप देशपांडे यांच्या मतांची चोरी आदित्य ठाकरे यांनी केली आहे का? या प्रश्नांची राज ठाकरेंनी उत्तरे द्यावीत, असे शेलार यांनी म्हटले.
हिंमत असेल तर उबाठाने एकट्याने लढून दाखवावे
याव्यतिरिक्त, शेलार यांनी ठाकरे गटावर मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या प्रभाग रचनेबद्दल टीका केली. मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या प्रभाग रचनेवरुन ठाकरे गटाकडून रडगाण्याचा बँड का वाजवला जात आहे? हिंमत असेल तर उबाठाने एकट्याने लढून दाखवावे, असेही त्यांनी म्हटले.
अमित साटम यांच्या अध्यक्षपदाबद्दल आनंद
याच पत्रकार परिषदेत, आशिष शेलार यांनी अमित साटम यांच्या नवीन नियुक्तीबद्दल आनंद व्यक्त केला. ते म्हणाले की, एक तरुण आणि संघर्षशील नेता मुंबई भाजपचा अध्यक्ष झाल्याने त्यांना आनंद आहे. साटम यांनी नगरसेवक, आमदार आणि कार्यकर्ता म्हणून केलेल्या कामाची प्रशंसा करत, त्यांच्या नेतृत्वाखाली भाजपची वाटचाल यशस्वी होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
हे ही वाचा…
मुंबई भाजप अध्यक्षपदी अमित साटम:रवींद्र चव्हाण, फडणवीसांनी केली घोषणा; मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर झाली निवड
भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी सोमवारी मुंबई भाजपच्या अध्यक्षपदी आमदार अमित साटम यांची निवड केली. ते मंत्री आशिष शेलार यांची जागा घेतील. मुंबई महापालिका आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने साटम यांच्या खांद्यावर देशाच्या आर्थिक राजधानीची जबाबदारी टाकली आहे. त्यामुळे ही निवडणूक अत्यंत चुरशीची होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. सविस्तर वाचा…
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.