digital products downloads

रोहित पवार 2019 मध्येच भाजपात येणार होते: नीतेश राणेंचा खळबळजनक दावा, म्हणाले – ते फक्त शरीराने शरद पवारांसोबत – Mumbai News

रोहित पवार 2019 मध्येच भाजपात येणार होते:  नीतेश राणेंचा खळबळजनक दावा, म्हणाले – ते फक्त शरीराने शरद पवारांसोबत – Mumbai News


भाजपचे नेते आणि मंत्री नीतेश राणे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांच्याबाबत मोठा दावा केला आहे. रोहित पवार हे 2019 मध्येच भाजपात येणार होते, असा खळबळजनक दावा नीतेश राणे यांनी केला आहे. इतकेच नाही, तर रोहित पवार हे

.

याआधी अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष आणि खासदार सुनील तटकरे यांनीही रोहित पवार भाजपात येऊ शकतात, असा सूचक इशारा दिला होता. सुनील तटकरे यांच्या विधानावर प्रतिक्रिया देताना, नीतेश राणे यांनी उपरोक्त दावा केला. त्यांची ही प्रतिक्रिया पाहता, हे विधान केवळ राजकीय डावपेच नव्हता, तर त्यामागे काही ठोस हालचाली असाव्यात, अशी चर्चा रंगू लागली आहे.

नेमके काय म्हणाले रोहित पवार?

नीतेश रोणे यांच्या हस्ते रत्नागिरीमधील मिरकरवाडा बंदराच्या दुसऱ्या टप्प्याच्या विकासकामांच्या भूमिपूजन पार पडले. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी बोलताना रोहित पवार यांच्याबाबत मोठा गौप्यस्फोट केला. “होय, 2019 मध्येच रोहित पवार भाजपात येणार होते, त्यामध्ये आश्चर्य कसले?” असा थेट सवाल करत त्यांनी सांगितले की, “ते कुठल्या कुठल्या भाजप नेत्यांना कधी भेटतात, हे जर आम्ही सांगायला लागलो ना, तर त्यांना तोंड वाचवायलाही जागा राहणार नाही.” याच वक्तव्यात राणे यांनी आणखी एक धक्कादायक विधान करत म्हटले की, “ते मनाने भाजपचे आहेत, फक्त शरीराने शरद पवार साहेबांबरोबर आहेत.”

महाराष्ट्रात राजकीय घडामोडींचा धुरळा?

राजकीय वर्तुळात यामुळे नव्या आघाड्यांच्या आणि संभाव्य गोटफेऱ्यांच्या चर्चा पुन्हा जोर धरू लागल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट, भाजप, शिवसेना (शिंदे गट) यांच्यात सध्या सत्तेत असलेल्या ‘महायुती’त अजून कोण कोण सामील होणार? कोण बाहेर पडणार? याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात आगामी काही दिवसात आणखी काही मोठ्या राजकीय घडामोडी घडणार का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

सिंधुदुर्ग-सागरी मार्ग लवकरच सुरु

याच कार्यक्रमात बोलताना नितेश राणे यांनी कोकणातील जनतेसाठी एक घोषणा केली. मुंबई ते सिंधुदुर्ग सागरी मार्गावरील प्रवास लवकरच सुरू होणार असून, “माझगाव ते रत्नागिरी तीन तास, त्यानंतर विजयदुर्ग, आणि पुढे सिंधुदुर्ग साडेचार तासांत गाठता येणार आहे,” अशी माहिती त्यांनी दिली.

या सेवेमध्ये रत्नागिरीसाठी खास स्टॉप असेल. एकाच वेळी 150 गाड्या आणि 500 प्रवाशांना वाहून नेणारी एम टू एम फेरी सेवा कार्यान्वित करण्याची योजना असून, लवकरच या प्रकल्पासंबंधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली सविस्तर पत्रकार परिषद घेऊन अधिकृत घोषणा केली जाणार असल्याचे राणे यांनी स्पष्ट केले.

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Uniq Art Store India

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Uttarakhand News Doonited
Social media & sharing icons powered by UltimatelySocial
Instagram
WhatsApp