
मराठा उपसमिती अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. तसेच देवेंद्र फडणवसीस यांनी १६ टक्के आरक्षण दिलेले महाविकास आघाडीने घालवले, असा आरोपही विखे पाटलांनी केला आहे. मनोज जरांगे य
.
ओबीसी नेते लक्ष्मण हाके हे सातत्याने मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून टीका करत आहेत. याविषयी राधाकृष्ण विखे पाटील यांना विचारले असता ते म्हणाले, मी याआधी पण म्हणालो आहे की लक्ष्मण हाकेचे यात बोलण्याचे कामच नाही. हाके यांनी यात लुडबूड करू नये. त्यांना तो अधिकारही नाही. समाजाचे लोक आंदोलन करत आहेत, त्यांच्या मागण्या ते मांडत आहेत, त्यांना मांडू द्या, त्यांचा अधिकार आहे तो. अन्य समाजाच्या लोकांनी त्यात का हस्तक्षेप करावा? हाके यांचे जे काही बेताल वक्तव्य आहेत ते थांबवले पाहिजेत, असे विखे पाटलांनी म्हटले आहे.
तसेच मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावे अशी मागणी आहे, यावर प्रतिक्रिया देताना राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले, यावर बोलणे योग्य नाही, कारण कायद्याच्या बऱ्याच गुंतागुंती आहेत. आपण मागास आयोग नेमला मग आरक्षण दिले. मध्ये १६ टक्के दिले नंतर परत १० टक्के दिले ते आता सर्वोच्च न्यायालयात टिकून आहे. नंतर केंद्र सरकारने १० टक्के आरक्षण जाहीर केले आहे याचाही फायदा मिळत आहे. मला असे वाटते, पूर्वी आरक्षणच नव्हते. परंतु, महाविकास आघाडीने घालवले होते आरक्षण. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यावर पुन्हा आरक्षण देण्याचा प्रयत्न केला. तसेच ओबीसीच्या आरक्षणाला धक्का पोहोचणार नाही याची काळजी आम्ही घेत आहोत.
दरम्यान, एकीकडे लाखोंच्या संख्येने मराठा बांधव मुंबईकडे रवाना होत असताना, सरकारकडून समेटाचा सूर आढळतो आहे. विखे पाटील यांनी स्पष्ट केले की, सरकारकडे आलेल्या मागण्यांवर सहानुभूतीपूर्वक विचार सुरू आहे, आणि नव्याने निवेदन आले तर त्यावरही चर्चा होईल. अशा पार्श्वभूमीवर आंदोलन आणि चर्चेतील तणाव, आता तोडग्याच्या दिशेने सरकतो का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.