digital products downloads

लव्ह जिहाद अस्तित्वात नाही, हा प्रोपागंडा: रामजन्मभूमी आंदोलन असत्याच्या आधारे उभारले गेले , प्रा. अभिजित देशपांडेंचे व्याख्यानात मत – Pune News

लव्ह जिहाद अस्तित्वात नाही, हा प्रोपागंडा:  रामजन्मभूमी आंदोलन असत्याच्या आधारे उभारले गेले , प्रा. अभिजित देशपांडेंचे व्याख्यानात मत – Pune News


प्राध्यापक अभिजित देशपांडे यांनी ‘सत्य असत्याशी मन केले ग्वाही’ या विषयावर व्याख्यान देताना ‘सत्याचा आवाज दाबला जात आहे’ असे मत व्यक्त केले. हे व्याख्यान महाराष्ट्र गांधी स्मारक निधीतर्फे आयोजित ‘राष्ट्रपिता महात्मा गांधी सप्ताहा’च्या निमित्ताने पुणे

.

देशपांडे यांनी रामजन्मभूमी आंदोलनावर भाष्य केले. ते म्हणाले की, हे आंदोलन असत्याच्या आधारे उभारले गेले होते. अयोध्या येथील जमिनीचे वाद पूर्वीपासून होते, परंतु त्यांचा मूळ रामजन्मभूमीशी संबंध नव्हता. १९८४ मध्ये विश्व हिंदू परिषदेने हे आंदोलन सुरू केले.

शाहबानो प्रकरणामुळे तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांच्यावर अल्पसंख्याकांचे लांगूलचालन केल्याचा आरोप झाला आणि धार्मिक दबावामुळे अयोध्येतील मंदिराचे कुलूप उघडले गेले. त्यानंतर उन्मादी धार्मिक वातावरणात बाबरी मशीद पाडण्यात आली. न्यायालयाचे पक्षपाती निर्णय, संघाचे कट्टरवादी आक्रमण, काँग्रेसचा छुपा पाठिंबा आणि बेजबाबदारपणा यामुळे हे घडले, असे देशपांडे यांनी नमूद केले.

‘लव्ह जिहाद’ सारखा प्रकार अस्तित्वात नसून, याबाबत जाणीवपूर्वक अपप्रचार (प्रोपागंडा) केला जातो, असेही ते म्हणाले. असत्याच्या गलबल्यात सत्याचा आवाज दाबण्याचा प्रयत्न होत आहे. बहुमताची दहशत प्रचंड असून अल्पसंख्याकांचे आवाज दाबले जात आहेत, असे मत लेखक आणि प्राध्यापक अभिजित देशपांडे यांनी व्यक्त केले.

या व्याख्यानासाठी डॉ. शिवाजीराव कदम, महाराष्ट्र गांधी स्मारक निधीचे अध्यक्ष डॉ. कुमार सप्तर्षी, सचिव अन्वर राजन, तेजस भालेराव आणि चिन्मय कदम उपस्थित होते.

देशपांडे पुढे म्हणाले की, आज आपण अशा काळात जगतो जिथे सत्य आणि असत्य यांची सरमिसळ केली जात आहे. संभ्रम निर्माण करणाऱ्या वास्तवात आपण भागीदार आहोत. हा संभ्रम संपवण्यासाठी आपली बुद्धी आणि विवेक जागृत ठेवणे आवश्यक आहे. बहुमतापेक्षा आपले म्हणणे वेगळे आहे हे सांगण्यासाठी विवेक जागृत असणे महत्त्वपूर्ण आहे.

बहुमत शहाणपणाचे हवे, पण सध्या ज्या बाजूला बहुमत आहे त्याच बाजूला सहज जाणे होत आहे. समाजात वेगवेगळ्या झुंडी तयार झाल्या असून, त्या सत्याला दडपण्याचा प्रयत्न करत आहेत. सोनम वांगचुक हे साध्या राज्याची गांधी मार्गाने मागणी करूनही त्यांच्यावर दडपशाही करण्यात येत आहे. बहुमत आधारे सरकार निवडून येतात, पण आता समाजात वेगवेगळ्या टोळ्या बनवून जाणीवपूर्वक टोळ्यांचे राजकारण सुरू आहे. चिकित्सा जागृत ठेवून पुढे जाणे आवश्यक आहे, असे आवाहन देशपांडे यांनी केले.

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Uniq Art Store India

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Uttarakhand News Doonited
Social media & sharing icons powered by UltimatelySocial
Instagram
WhatsApp