digital products downloads

‘लोकल ठप्प होणार नाही यासाठी…’, मुंबई तुंबल्याने ठाकरे सेनेचे फडणवीसांना 7 प्रश्न; ‘एकापाठोपाठ…’

‘लोकल ठप्प होणार नाही यासाठी…’, मुंबई तुंबल्याने ठाकरे सेनेचे फडणवीसांना 7 प्रश्न; ‘एकापाठोपाठ…’

Mumbai Rains Criticism: मुंबईमध्ये मागील दोन दिवसांपासून पडत असलेल्या पावसाने हाहाकार माजला आहे. ठप्प झालेली लोकल ट्रेनची वाहतूक, जागोजागी तुंबलेलं पाणी, रस्त्यांवरील वाहतूक कोंडी अशा अवस्थेतील मुंबई पाहून उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य केलं आहे. ‘सामना’च्या अग्रलेखातून ठाकरेंच्या शिवसेनेनं फडणवीसांवर प्रश्नांचा पाऊस पडाल्याचं पाहायला मिळत आहे. ठाकरेंच्या शिवसेनेनं सरकारला एकूण सात प्रश्न विचारलेत.

महापालिकेचा आपत्कालीन कक्ष काय करीत होता?

“हवामान खात्याचा इशारा आला की, सरकार ‘रेड अलर्ट’चे पत्रक काढून मोकळे होते. ‘रेड अलर्ट’चा इशारा दिला आणि जनतेला सावध राहायला सांगितले म्हणजे सरकारची जबाबदारी संपते काय? पाऊस सुरू झाला की, लोक आपापल्यापरीने सावधगिरी बाळगतातच, पण यंदाच्या पावसाळ्यात मुंबई दुसऱ्यांदा बुडाली त्याला जबाबदार कोण?” असा सवाल ठाकरेंच्या शिवसेनेनं विचारला आहे.

लोकल सेवा ठप्प होणार नाही यासाठी कोणती उपाययोजना केली?

“मुख्यमंत्री फडणवीस महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षात येऊन लोकांनी सावधगिरी बाळगावी असा इशारा देऊन मोकळे झाले. जनतेला सावधानतेचा इशारा देणाऱ्या सरकारने मुंबई जलमय होणार नाही यासाठी कोणती सावधानता बाळगली? रस्ते बंद होणार नाहीत, मुंबईची जीवनवाहिनी असलेली लोकल सेवा ठप्प होणार नाही यासाठी कोणती उपाययोजना केली? एकापाठोपाठ एक सर्व रस्ते जलमय होत असताना सरकार व महापालिकेचा आपत्कालीन कक्ष काय करीत होता?” असा सवाल ठाकरेंच्या शिवसेनेनं केला आहे.

एक सहपालकमंत्री कबुतराच्या वादात भलतेच सक्रिय झाले होते, मात्र…

“मेमध्ये पहिल्या पावसात मुंबई बुडाली तेव्हा त्याचे खापर कंत्राटदारावर फोडून सरकारने जबाबदारी ढकलली होती. मग आता पुन्हा बुडालेल्या मुंबईचे खापर फोडण्यासाठी सरकारने कोणाचे डोके शोधले आहे? मुंबई शहराला तीन-तीन पालकमंत्री आहेत व मुंबई जलमय होत असताना हे तिन्ही पालकमंत्री काय करीत होते? यातील एक सहपालकमंत्री कबुतराच्या वादात भलतेच सक्रिय झाले होते. मात्र पावसामुळे मुंबईकरांची दैना उडत असताना ते निष्क्रिय दिसले,” असा टोला ठाकरेंच्या शिवसेनेनं लगावला आहे.

फोटोसेशन व चमकोगिरी

“आपले व आपल्या मिंधे मंडळातील सहकारी मंत्र्यांचे घोटाळे लपवण्यासाठी ऊठसूट दिल्लीला पळणारे मुंबई शहराचे पालकमंत्री गेल्या दोन दिवसांत मुंबईकरांच्या मदतीला धावून आल्याचे कुठे दिसले नाही. आता मात्र त्यांचे फोटोसेशन व चमकोगिरी सुरू आहे,” असा टोला अग्रलेखातून लागवण्यात आला आहे.

FAQ

उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर कोणती टीका केली आहे?
उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने ‘सामना’च्या अग्रलेखातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महाराष्ट्र सरकारवर मुसळधार पावसामुळे मुंबईत निर्माण झालेल्या परिस्थितीवरून जोरदार टीका केली आहे. मुंबईतील पाणी तुंबणे, लोकल ट्रेन वाहतूक ठप्प होणे, रस्त्यांवरील वाहतूक कोंडी आणि अपुऱ्या उपाययोजनांबाबत सरकारला जबाबदार धरलं आहे.

शिवसेनेने ‘रेड अलर्ट’बाबत काय सवाल उपस्थित केला आहे?
शिवसेनेने विचारलं आहे की, हवामान खात्याचा इशारा मिळाल्यावर सरकार फक्त ‘रेड अलर्ट’चं पत्रक काढून मोकळं होतं का? रेड अलर्ट जारी करून जनतेला सावध राहण्यास सांगितलं म्हणजे सरकारची जबाबदारी संपते का? मुंबई दुसऱ्यांदा जलमय झाल्याला जबाबदार कोण, असा सवाल त्यांनी केला आहे.

मुंबईतील लोकल ट्रेन वाहतूक ठप्प होण्याबाबत शिवसेनेने काय म्हटलं आहे?
शिवसेनेने टीका केली आहे की, मुंबईची जीवनवाहिनी असलेली लोकल ट्रेन सेवा ठप्प होऊ नये यासाठी सरकारने कोणती उपाययोजना केली? मुख्यमंत्री फडणवीस यांनी फक्त लोकांना सावधगिरी बाळगण्याचा सल्ला देऊन जबाबदारी टाळली, पण रेल्वे वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी कोणतेही ठोस पाऊल उचललं गेलं नाही, असा आरोप त्यांनी केला आहे.

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Uniq Art Store India

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Uttarakhand News Doonited
Social media & sharing icons powered by UltimatelySocial
Instagram
WhatsApp