
अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित लोकशाही दिन व जिल्हा परिषदेतील तक्रार निवारण दिन या दोन्ही ठिकाणी आज, सोमवारी एकही तक्रार दाखल करण्यात आली नाही. त्यामुळे लोकशाही दिनाच्या कारवाईला उपस्थित झालेल्या अधिकाऱ्यांना खाली हात परत जावे लागले, तर तिकडे
.
शासकीय नियमानुसार दर महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात महिला लोकशाही दिवस भरवला जातो. तर जिल्हा परिषदेत याच दिवशी तक्रार निवारण दिन भरवण्याची नवी पद्धत सुरु करण्यात आली आहे. परंतु आज दोन्ही यंत्रणांकडे नागरिकांनी पाठ फिरवली. महिला लोकशाही दिन असल्याने जिल्हा परिषद, राज्य शासनाचा महिला व बालविकास विभाग, पोलिस आयुक्त कार्यालय, तहसील कार्यालय, महिला व बालविकास विभागाच्या निरीक्षण गृहाचे अधिकारी आणि स्वत: आरडीसी यांनी काही वेळ वाट बघून दुपारी २ च्या सुमारास या दिवसाची कारवाई संपल्याचे जाहिर केले.
अशीच स्थिती जिल्हा परिषदेच्या तक्रार निवारण दिनाचीही झाली. हा तक्रार निवारण दिन सीइओंच्या दालनात भरवला जात असतो. नेहमीप्रमाणे त्यांनी तक्रारदारांची वाट बघितली. परंतु दुपारी २ पर्यंत राखून ठेवलेल्या वेळांत कुणीही तिकडे फिरकले नाही.
का नाही आले तक्रारदार?
तज्ज्ञांच्या मते सध्या पावसाचे दिवस आहेत. ग्रामीण भागातील बहुतेक नागरिक शेतीकाम करणारे असल्याने ते त्या कामांमध्ये व्यग्र झाले आहेत. त्यामुळे कदाचित जिल्ह्याच्या ठिकाणी पोहचून तक्रारी दाखल करण्यास त्यांना प्राधान्य द्यावेसे वाटले नसावे. परिणामी दोन्ही यंत्रणांमध्ये तक्रारदारांचा शुकशुकाट होता. काहींच्या मते गेल्या काही दिवसांमध्ये झालेल्या कारवाईतून बरेचसे प्रश्न निकाली निघाले आहेत, त्यामुळेही कदाचित आज दोन्ही ठिकाणी तक्रारदार पोहोचले नसावे.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.