digital products downloads

वादग्रस्त विधानं करणाऱ्या BJP खासदारावरुन फडणवीसांची सारवासारव; म्हणाले, ‘त्यांनी सरसकट मराठी माणसाला…’

वादग्रस्त विधानं करणाऱ्या BJP खासदारावरुन फडणवीसांची सारवासारव; म्हणाले, ‘त्यांनी सरसकट मराठी माणसाला…’

Fadnavis On Nishikant Dubey Comment: भारतीय जनता पार्टीचे झारखंडमधील खासदार निशिकांत दुबेंनी महाराष्ट्र आणि मराठीबद्दल केलेल्या बेताल विधानावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहिली प्रतिक्रिया नोंदवली आहे. फडणवीस यांनी दुबेंचं विधान हे मराठी माणसासाठी नव्हतं तर संघटनेबद्दल म्हणजेच उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि राज ठाकरेंच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेबद्दल होतं अशा अर्थाचं विधान केलं आहे. मुंबईत पत्रकारांशी संवाद साधताना फडणवीस यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

दुबे नेमकं काय म्हणाले होते?

मराठी आणि हिंदी वादाच्या पार्श्वभूमीवर एएनआय या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीमध्ये निशिकांत दुबेंनी, “तुम्ही कोणाच्या भाकरी खात आहात? तिथे टाटा-बिर्ला आहेत? तुम्ही आमच्या पैशावर जगता. तुम्ही किती टॅक्स भरता? तुमच्याकडे कोणते उद्योग आहेत? आमच्याकडे खाणी आहेत, तुमच्याकडे खाणी आहेत का? सगळे उद्योग गुजरातमध्ये जात आहेत. हिंदी भाषिकांना मारहाण करता मग इतर भाषिकांना का मारहाण करत नाहीत?” असा सवाल विचारला आहे. “तुम्ही कोणाच्या भाकरी खात आहात? तिथे टाटा-बिर्ला, रिलायन्स आहेत? तुम्ही आमच्या पैशावर जगता. तुम्ही किती टॅक्स भरता? तुमच्याकडे कोणते उद्योग आहेत? आमच्याकडे खाणी आहेत, झारखंड, छत्तीसगड, मध्य प्रदेश, ओडिशाकडे आहेत खाणी! तुमच्याकडे खाणी आहेत का? सगळे उद्योग गुजरातमध्ये जात आहेत. सेमी कंडक्टरचा उद्योग गुजरातमध्ये आहे. हिंदी भाषिकांना मारहाण करता मग इतर भाषिकांना का मारहाण करत नाहीत? ऊर्दू, तमिळी, तेलगु लोकांना मारहाण करा ना असा सवाल निशिकांत दुबे यांनी विचारला आहे. “स्वत:च्या घरात आहात तेव्हा मोठे बॉस आहात. या बिहारमध्ये, उत्तर प्रदेशमध्ये, तामिळनाडूमध्ये या तिथे तुम्हाला आपटून आपटून मारु,” अशी दर्पोक्ती दुबे यांनी केली

त्यांनी मराठी माणसाला सरसकट म्हटलेलं नाही

याचसंदर्भात फडणवीस यांना पत्रकारांनी विचारलं असता त्यांनी, “पहिली गोष्ट अशी की निशिकांत दुबे यांचं पूर्ण ऐकलं तर ते संघटनेसंदर्भात बोलले आहेत. मराठी माणसाला त्यांनी सरसकट म्हटलेलं नाही,” असं स्पष्ट केलं. पुढे बोलताना, “तथापी माझं मत असं आहे की अशाप्रकारे बोलणं योग्य नाही. कारण त्याचे जे अर्थ निघतात ते लोकांच्या मनात संभ्रम तयार करतात,” असंही फडणवीस म्हणाले.

उरलेला भारत आम्ही मराठ्यांचा मुलूक म्हणून मान्य करु अशी ऑफर होती तरी…

“मराठी माणसाचं ऐतिहासिक योगदान महाराष्ट्रात प्रचंड मोठं आहे. आपल्याला कल्पना आहे की परकीय आक्रमकांनी येथील संपूर्ण संपवण्यासाठी आक्रमण केलं तेव्हा ती जिवंत ठेवण्याचं काम छत्रपती शिवरायांनी केलं. छत्रपती संभाजी महाराजांनी केलं. त्यानंतर मराठ्यांनी संपूर्ण भारतामध्ये आपली संस्कृती जिवंत ठेवण्यासाठी संपूर्ण भारतात लढाई केली. आपल्याला माहितीये की पानिपतची लढाई देखील मराठे लढले होते. अमहद शाह अब्दालीने त्यांना स्पष्ट तहाचं पत्र दिलेलं. मला पाकिस्तानमधील पंजाबपासून पेशावरपर्यंत, बलुचिस्तानपर्यंत प्रांत देऊन टाका उरलेला भारत आम्ही मराठ्यांचा मुलूक म्हणून मान्य करु. मात्र मराठ्यांनी तो ही मुलूक सोडला नाही. ते अखंड भारत म्हणून पानिपतच्या लढाईला गेले होते. त्यामुळे हा मराठ्यांचा इतिहास आहे,” अशी आठवण फडणवीस यांनी करुन दिली. 

इतिहासामध्ये आणि वर्तमानामध्ये कोणीच…

“आजही देशाच्या जीडीपीमध्ये सर्वाधिक योगदान देणारा महाराष्ट्र आहे. त्यामुळे मला असं वाटतं की महाराष्ट्र आणि मराठीचं योगदान या देशाच्या इतिहासामध्ये आणि वर्तमानामध्ये कोणीच नाकारु शकत नाही. कोणी नाकारत असेल तर ते चुकीचं आहे,” असं फडणवीस म्हणाले. 

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Uniq Art Store India

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Uttarakhand News Doonited
Social media & sharing icons powered by UltimatelySocial
Instagram
WhatsApp