
अमरावती धारणी तालुक्यात रविवारी सायंकाळी ५ ते साडेसहा या दीड तासात अवकाळी पावसाने दाणादाण उडवली आहे. सोसाट्याचा वारा, विजांचा कडकडाट आणि जोरदार पावसाचा तालुक्यातील सहा ते सात गावांना जबर फटका बसला आहे. या गावांमधील सात ते आठ शेळ्या व सात ते आठ गाई व
.
वीज खांब उखडून पडले धारणी परिसरात झालेल्या वादळाने झाडे उन्मळून महावितरणच्या वीज वाहिन्यांवर पडले. तसेच वीज खांबही उखडून जमीनदोस्त झालेत. वादळाचा जोर कमी होताच महावितरणने वीज दुरुस्ती कार्याला सुरुवात केली आहे. मात्र रात्रीची वेळ, पाऊस आणि जंगलाचा भाग असल्याने दुरुस्ती कार्याला अडथळा निर्माण झाला आहे. वादळामुळे अचलपूर व धारणी परिसरातील सात फिडर बाधित झाले. यात प्रामुख्याने हरिसाल मिश्र, दुनी, पाटिया, धारणी, कुटांगा, ढाकरमल आणि दिया या मिश्र फिडरचा समावेश आहे.
वादळासह अवकाळी पावसाने रविवारी जिल्ह्यातील चार तालुक्यांत कहर केला. धारणीत वीज कोसळल्यानंतर झाडाखाली दबून १५ जनावरांचा मृत्यू झाला. जोरदार वादळामुळे काही घरांवरील टिनपत्रे उडाली, विजेचे खांब वाकून वाहिन्या तुटल्याने काही गावांमधील वीज प्रवाह खंडित झाला. अंजनगाव सुर्जी तालुक्यातील चिंचोना परिसरात वीज पडून दोन बैल ठार झाले. २० एकरावरील केळीचे पीक भुईसपाट झाले. त्याचप्रमाणे उन्हाळी ज्वारीचेही नुकसान झाले आहे. वरुड शहरात रसवंतीवर मोठे झाड कोसळल्याने रसवंतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून संत्र्यालाही फटका बसला आहे. तिवसा तालुक्यातही उन्हाळी पीक कांदा, ज्वारीचे नुकसान झाले आहे.
अंजनगाव सुर्जी तालुक्यात केळीच्या पिकांना फटका : अंजनगाव सुर्जी तालुक्यात गेल्या तीन-चार दिवसांपासून अनेक गावांमध्ये वादळी वाऱ्यासह झालेल्या अवकाळी पावसामुळे केळी, उन्हाळी ज्वारी या पिकांचे नुकसान झाले. तर १७ मे रोजीच्या अवकाळीचा सर्वात जास्त फटका निमखेड बाजार, डोंगरगाव, चिंचोना व परिसरातील केळी पिकाला बसला आहे. तसेच चिंचोना येथे वीज कोसळून दोन बैलांचा मृत्यू झाल्याने शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे. १७ मे रोजी निमखेड-चिंचोना परिसराच्या आजूबाजूच्या गावांमध्ये दुपारी ३.३० ते ४.३० पर्यंत विजांचा कडकडाट व वादळी वाऱ्यासह परिसरात अवकाळी पावसाने हजेरी लावली. या वादळात चार गावांतील २० हेक्टर क्षेत्रातील केळी कोलमडून पडल्याने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. यात डोंगरगाव येथील भास्कर ज्ञानदेव ताकोते यांच्या शेताच्या धुऱ्यावर वीज कोसळल्याने तेथे बांधलेले अमोल गजानन वानखडे रा. चिंचोना यांचे दोन बैल जागीच ठार झाले. परिसरातील शेतकरी नाना महारनर, सुनील गिऱ्हे, आकाश गिऱ्हे, सुजित वानखडे, सुभाष थोरात, रवी वानखडे याच्या शेतातील केळीचे पीक वादळाने भुईसपाट झाले असून, २० हेक्टरवरील केळी पिकाचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.