
Maharashtra Weather News : नैऋत्य मोसमी वाऱ्यांच्या परतीचा प्रवास सुरू झाला असून, याच दरम्यान राज्याच्या काही भागांमध्ये पावसासाठी पोषक वातावरणनिर्मिती होताना दिसत आहे. ज्यामुळं पुढील 24 तासांमध्ये एकिकडे मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये तापमानात काहीशी वाढ अपेक्षित असतानाच दुसरीकडे मराठवाड्याचा उत्तरेकडील भाग, विदर्भाचा पूर्वेकडील भाग आणि उत्तर मध्य महाराष्ट्रात मध्यम ते जोरदार स्वरुपातील पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
शक्ती वादळाचा राज्यातील कोणत्या भागांवर परिणाम?
शक्ती चक्रीवादळाचा महाराष्ट्रावर थेट परिणाम होणार नाही असा प्राथमिक अंदाज हवामान विभागानं वर्तवलेला असतानाही काही प्रमाणात झालेल्या हवामान बदलांमुळं मात्र राज्यावर शक्तीच्या प्रभावासह परतीच्या पावसाचाही परिणाम दिसून येत आहे. ज्यामुळं लातूर धरशिवसह कोकण, मध्य महाराष्ट्रात पुढील 48 तासांमध्ये मुसळधार पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर, ठाणे, पालघर, कोकण किनारपट्टीवर मुसळधार पावसाची हजेरी असेल. राज्यात पुढील चार-पाच दिवसांत कमाल तापमानात वाढ अपेक्षित असून, किमान तापमानात मात्र फारसे बदल होणार नाहीत.
हवामान विभागाच्या मुंबई शाखेनुसार 7 ते 11 ऑक्टोबरदरम्यान मराठवाड्यात पुन्हा पावसाची हजेरी असून यास विजांच्या कडकडाटाची जोड असेल. या दरम्यान ताशी 30 ते 40 किमी वेगानं वारे वाहतील.
तपशीलवार जिल्हानिहाय हवामान अंदाज व चेतावणीसाठी कृपया https://t.co/jw7yrf9chD भेट घ्या. pic.twitter.com/98O2cQkliC
— Regional Meteorological Center,Mumbai (@RMC_Mumbai) October 7, 2025
हिमाचल प्रदेशात काही ठिकाणी पावसाची हजेरी असून, उत्तर भारतातील काही राज्यांचासुद्धा यामध्ये समावेश असेल. तर अतीव उत्तरेकडे शीतलहरींनी देशाचं दार ठोठावलं असून, काश्मीर, उत्तराखंड, राजस्थानात हवा कोरडी होण्यास सुरुवात झाली आहे. उत्तराखंड आणि हिमाचलसह जम्मू काश्मीरच्या पर्वतीय भागांमध्ये यंदाच्या वर्षातील हिमवृष्टीस सुरुवात झाली असून, या थंडीमुळं देशभरातील तापमानात काही बदल अपेक्षित आहेत असा इशारा आयएमडीनं वर्तवला आहे.
FAQ
पुढील 24 तासांमध्ये महाराष्ट्रात काय हवामान अपेक्षित आहे?
नैऋत्य मोसमी वाऱ्यांच्या परतीच्या प्रवासामुळे राज्याच्या काही भागांमध्ये पावसासाठी पोषक वातावरण आहे. मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये तापमानात काहीशी वाढ अपेक्षित असली तरी मराठवाड्याचा उत्तरेकडील भाग, विदर्भाचा पूर्वेकडील भाग आणि उत्तर मध्य महाराष्ट्रात मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे.
शक्ती चक्रीवादळाचा महाराष्ट्रावर परिणाम काय आहे?
शक्ती चक्रीवादळाचा महाराष्ट्रावर थेट परिणाम होणार नाही, असा प्राथमिक अंदाज असला तरी अप्रत्यक्ष प्रभाव दिसत आहे. चक्रीवादळामुळे हवामान बदलले असून, परतीच्या पावसासोबत पावसाचा जोर वाढला आहे.
कोणत्या भागांसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे?
लातूर, धराशिवसह कोकण आणि मध्य महाराष्ट्रात पुढील 48 तासांमध्ये मुसळधार पावसासाठी यलो अलर्ट जारी आहे. ठाणे, पालघर आणि कोकण किनारपट्टीवर मुसळधार पावसाची शक्यता आहे.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.