digital products downloads

वादाचे पुरात विसर्जन करून गुण्यागोविंदाने राहा: व्यक्तीच्या चुकीसाठी समाजाला दुषणे नको, रोहित पवार यांचे अहिल्यानगर वादावर भाष्य – Mumbai News

वादाचे पुरात विसर्जन करून गुण्यागोविंदाने राहा:  व्यक्तीच्या चुकीसाठी समाजाला दुषणे नको, रोहित पवार यांचे अहिल्यानगर वादावर भाष्य – Mumbai News


राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी अहिल्यानगर येथील धार्मिक वादाचे पुरात विसर्जन करत नागरिकांना गुण्यागोविंदाने नांदण्याचे आवाहन केले आहे. एक व्यक्ती चुकला म्हणून सर्व समाज चुकला असे नाही, असेही ते या प्रकरणी म्ह

.

अहिल्यानगर येथे सोमवारी आय लव्ह मोहम्मद असा उल्लेख असणारी रांगोळी काढण्यात आली होती. या रांगोळीवरून दुर्गामाता दौडीचे आयोजन करण्यात आले होते. या मुद्यावरून शहरात मोठा तणाव निर्माण झाला होता. या प्रकरणी मुस्लिम समाजाने पुणे – छत्रपती संभाजीनगर महामार्ग रोखून धरला. त्यामुळे पोलिसांवर बळाचा वापर करण्याची वेळ आली. या पार्श्वभूमीवर आमदार रोहित पवार यांनी जनतेला शांततेचे आवाहन केले आहे. ते म्हणाले, कोविड असो किंवा अतिवृष्टीने आलेला पूर.. या दोन्ही प्रसंगाच्या वेळी सर्वांनी जात-धर्म विसरून मानवता धर्माला जागत एकमेकांना आधार दिला. हा एकप्रकारे निसर्गाने आपल्याला दिलेला एक मोलाचा संदेशच म्हणावा लागेल.

पण अशा परिस्थितीतही अहिल्यानगरमध्ये आज काही समाजकंटकांनी दोन समुदायात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला, हे अत्यंत दुर्दैवी आहे. एखादी व्यक्ती चुकली असेल तर सर्व समाजच चुकला असा त्याचा अर्थ होत नाही.

कुणीही कितीही द्वेष पसरवला तरी आपण वादाचे पुरात विसर्जन करू

राजकीय पुनर्वसनासाठी किंवा स्वतःचा भविष्यातील मार्ग दुसऱ्या पक्षाच्या माध्यमातून सुरक्षित करण्यासाठी कुणी दोन समाजात द्वेष पसरवत असेल तर ते योग्य नाही, पण दुर्दैवाने अहिल्यानगरमध्ये हे जाणीवपूर्वक होताना दिसतंय. कुणी स्वार्थासाठी जाती-धर्मात कितीही वाद निर्माण केला तरी या वादाचं आपण मात्र पुरामध्ये विसर्जन करून सर्वजण गुण्यागोविंदाने एकत्र राहू… एवढं केलं तरी आजच्या या पुराच्या वाईट प्रसंगातून चांगलं काहीतरी घडलं, असं म्हणता येईल. पोलिसांनीही कुणाच्याही दबावाखाली येऊन कुठलीही चुकीची कृती करु नये. कायद्याला अभिप्रेत असं निष्पक्ष राहून शहरात कायदा व सुव्यवस्था राखण्याची भूमिका घ्यावी आणि नागरिकांनीही पोलिस प्रशासनाला सहकार्य करावं, ही विनंती, असे त्यांनी म्हटले आहे.

घटनेला राजकीय रंग देण्याचा प्रयत्न करू नये – विखे पाटील

दुसरीकडे, भाजप नेते तथा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनीही या प्रकरणी नागरिकांना शांततेचे आवाहन केले आहे. ते म्हणाले, ज्याने रांगोळी काढली होती त्याला कालच अटक झाली. अटक झाल्यानंतर निदर्शने करण्याची काहीच आवश्यकता नव्हती. आता या प्रकरणाला राजकीय रंग देण्याची काहीच गरज नाही. वाचाळवीर पुढाऱ्यांनीही प्रक्षोभक विधाने टाळली पाहिजेत. आपण पुरोगामी महाराष्ट्रात राहतो. त्यामुळे कुणीही धार्मिक तेढ निर्माण होईल असे वागू नये, असे ते म्हणालेत.

नेमके काय घडले अहिल्यानगरात?

आमच्या रिपोर्टरच्या माहितीनुसार, सोमवारी सकाळी बारातोटी कारंजा परिसरात दुर्गा दौडच्या स्वागतासाठी फुलांची रांगोळी काढण्यात आली होती. या रांगोळीत इंग्रजी अक्षरात प्रेषित पैगंबर यांचे नाव रेखाटण्यात आले होते. त्यानंतर या नावावरून दौड नेण्यासाठी व्यवस्था करून देत जाणीवपूर्वक अपमान केला, मुस्लिम समाजाच्या भावना दुखावल्याप्रकरणी आरती संग्राम रासकर व संग्राम आसाराम रासकर (रा. बारा तोटी कारंजा) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शेख अल्तमश सलीम जरीवाला यांनी फिर्याद दिली आहे. या प्रकरणी एकास ताब्यात घेण्यात आले आहे.

या घटनेनंतर व पोलिसांनी केलेल्या लाठीमारामुळे आक्रमक झालेला मुस्लिम समाज कोटला परिसरात महामार्गावर उतरला. जमावाने महामार्गावर रास्तारोको आंदोलन केले. आंदोलनादरम्यान काही युवकांनी रस्त्यावरील वाहनांवर दगडफेक केल्याने आंदोलनाला वेगळे वळण लागले. पोलिसांनी तत्काळ आंदोलकांवर लाठीमार करत जमावाला पांगवले. त्यामुळे पळापळ झाली. या घटनेमुळे कोठला परिसरात व संपूर्ण शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Uniq Art Store India

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Uttarakhand News Doonited
Social media & sharing icons powered by UltimatelySocial
Instagram
WhatsApp