
भोर येथील बौद्ध युवक विक्रम गायकवाड यांच्या आंतरजातीय विवाहामुळे झालेल्या हत्येनंतर आंबेडकरी चळवळीत तीव्र संताप व्यक्त होत आहे. या प्रकरणी १८ फेब्रुवारीला भोर तहसील कार्यालयावर हजारो लोकांनी मूक मोर्चा काढला.
.
पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी आज प्रतिनिधी मंडळाला भेटून या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेतल्याचे सांगितले. त्यांनी आठ अधिकारी व कर्मचाऱ्यांचा समावेश असलेल्या विशेष तपास पथकाची (एसआयटी) स्थापना केली आहे.
फिर्यादी व साक्षीदारांवर कोणताही दबाव येऊ नये यासाठी ॲट्रॉसिटी कायद्यानुसार पीडित कुटुंबाला २४ तास पोलीस संरक्षण देण्यात येणार आहे. जिल्हा समाज कल्याण कार्यालयाने पीडित मातेच्या नावे ४ लाख २५ हजार रुपयांचा सहायता निधी वर्ग केला आहे.
रिपब्लिकन पक्षाचे नेते परशुराम वाडेकर यांनी सांगितले की, २२ फेब्रुवारीला केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले पीडित कुटुंबाची भेट घेणार आहेत. ते या प्रकरणी न्याय मिळावा यासाठी मुख्यमंत्री व पोलीस महासंचालकांशी चर्चा करणार आहेत.
डॉ. सिद्धार्थ धेंडे यांनी कार्यकर्त्यांना जबाबदारीने प्रकरणाकडे पाहण्याचे आवाहन केले आहे. राहुल डंबाळे यांनी वाढत्या ऑनर किलिंगच्या घटनांमुळे तरुणांमध्ये निर्माण झालेल्या भीतीच्या वातावरणाकडे लक्ष वेधले. त्यांनी ऑनर किलिंग विरोधी कायदा तात्काळ करण्याची मागणी केली आहे.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.