digital products downloads

विज्ञान शाळेतील प्रयोग शेतकऱ्यांपर्यंत पोहोचावेत: डॉ. श्रीपाल सबनीस यांचे मनोहर कोलते मैत्र संघाच्या कार्यक्रमात मत – Pune News

विज्ञान शाळेतील प्रयोग शेतकऱ्यांपर्यंत पोहोचावेत:  डॉ. श्रीपाल सबनीस यांचे मनोहर कोलते मैत्र संघाच्या कार्यक्रमात मत – Pune News


अनेकदा पारंपारिक शिक्षण हे रोजच्या जगण्यातील समस्यांना भिडण्यात अपूरे ठरते. त्यामुळे विज्ञान शाळेतील प्रयोग शेतकऱ्यांच्या बांधा पर्यंत पोहोचल्यास शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न सुटतील. त्यातून शेती सुलभ आणि परवडणारी होईल, असा विश्वास ज्येष्ठ साहित्यिक आणि म

.

मनोहर कोलते मैत्र संघ पुणे, तर्फे आयोजित सत्कार सोहळा आणि पुस्तक प्रकाशन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून डॉ. श्रीपाल सबनीस बोलत होते.

महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या माधवराव पटवर्धन सभागृहात झालेल्या या कार्यक्रमात महावितरण मुंबईच्या मानव संसाधन विभागाचे संचालक म्हणून पदोन्नती झाल्याबद्दल राजेंद्र पवार यांचा आणि शेती विकासासाठी आधुनिक यंत्रे निर्माण करुन शेतकऱ्यांना मदत करणारे तरुण संशोधक निरंजन तोरडमल यांचा सत्कार करण्यात आला. तसेच यावेळी वेदांत प्रकाशनातर्फे मनोहर कोलते लिखित आणि संकलित ‘मनोहारी विचार भाग ३’ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.

यावेळी व्यासपीठावर महाराष्ट्र आर्थिक विकास महामंडळाचे उपाध्यक्ष सचिन ईटकर, सरहद्द, पुणेचे संस्थापक संजय नहार, ज्येष्ठ साहित्यिक आणि समीक्षक डॉ. केशव देशमुख आणि मैत्र संघ, पुणेचे प्रमुख मनोहर कोलते आदी मान्यवर उपस्थित होते.

डॉ. श्रीपाल सबनीस म्हणाले की, मुल्याधिष्ठीत समाज निर्मितीसाठी मूल्यांवर विश्वास असणाऱ्या पिढीची गरज आहे. राजकारण मूल्यहिन होत असताना मूल्यांचे संस्कार असलेली पिढीच समाजाचे नेतृत्व करू शकते.

सचिन ईटकर म्हणाले की, सध्या सगळीकडे भयावह परिस्थिती आहे. आशा-निराशेचा खेळ सुरू असून कोणत्याही क्षेत्रात उत्साहवर्धक काम होताना दिसून येत नाहीये. अशावेळी प्रशासनामध्ये आशावाद पेरणाऱ्या लोकांची नेमणूक होणे, निश्चितच आवश्यक आहे. राजकारणी व्यक्ती केवळ एका निवडणुकीपुरता विचार करतात. तर नेतृत्व करणारे लोक एका पिढीचा विचार करतात. आपल्याला निवडणुकीपुरता विचार करणारे नेते नको असून पिढ्यांचा विचार करणारे नेतृत्व पाहिजे आहे.

यावेळी बोलताना संजय नहार म्हणाले की, आग विध्वंसक असते आणि आग संहारक पण असते. आपण तिचा कशा पद्धतीने वापर करतो, हे त्या व्यक्तीच्या दृष्टीकोनावर अवलंबून असतो. आपण त्या आगीपासून कोणाचे घर पेटवतो की, पणती प्रज्वलीत करतो ती कृती अधिक महत्त्वाची असते.

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Uniq Art Store India

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Uttarakhand News Doonited
Social media & sharing icons powered by UltimatelySocial
Instagram
WhatsApp